दिव्यांगत्वापेक्षा व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींकडे पाहताना त्यांच्या दिव्यांगत्वापेक्षा त्यांच्याकडे सर्वप्रथम व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. पालक, शिक्षक आणि समाजाने मुलाकडे प्रथम एक मूल म्हणून पाहावे आणि त्यानंतर त्याच्या दिव्यांगत्वाचा विचार करावा. दिव्यांगत्व ही व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू असून ती त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांगजन विषयक विभागाच्या नावातील बदलही याच दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. ‘Department of Disability Affairs’ ऐवजी ‘Department of Empowerment of Persons with Disabilities’ असे नामकरण करून दिव्यांगत्वापेक्षा व्यक्तीच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment