Friday, 24 July 2026

राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ

 राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी

रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ

–  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

मुंबई, दि. २२: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक रोजगाराच्या संधीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत असून मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा संकल्प अधिक दृढ करत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

विभागामार्फत १,६१९ रोजगार मेळावे

कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने उद्योग, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासात देशात आघाडी घेतली आहे. एप्रिल २०२४ ते जून २०२६ या कालावधीत विभागामार्फत १,६१९ रोजगार मेळावे आयोजित करून ८५,८३४ युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १,३८,६३५ युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी ₹८९७.६५ कोटींचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे.

याशिवाय राज्यातील २,५०७ कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमधून ३.८४ लाखांहून अधिक युवक प्रशिक्षण घेत आहेत, तर राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनांद्वारे १.७१ लाखांहून अधिक उमेदवार रोजगारक्षम झाले आहेत. राज्यातील आयटीआयमधून दरवर्षी १.५ लाख युवक उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ म्हणून तयार होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अल्पकालीन अभ्यासक्रम, कौशल्य केंद्रे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना बदलत्या रोजगार बाजारपेठेसाठी सक्षम करण्याचे काम विभाग करत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi