योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वित न झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली. विशेषतः कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी समन्वयातून तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून जलवाहिनीचे काम वेगाने पूर्ण होऊन योजना लवकर कार्यान्वित होईल आणि पनवेल शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
राज्यातील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यास शासन प्राधान्य देत असून, संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment