खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढवण्याबरोबरच
धरणातील गाळ काढण्याचा आराखडा तयार करा
– मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
· जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा
मुंबई, दि. २९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावासोबतच हा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावा. त्यामुळे प्रकल्पात अधिक पाणीसाठा निर्माण होईल आणि नवीन धरण उभारण्यासाठी लागणारा मोठा खर्चही वाचू शकतो. या दृष्टीने जलसंपदा विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
No comments:
Post a Comment