Monday, 11 May 2026

देशाच्या फाळणीनंतर या समाजाला घर, शेती, व्यापार सोडून विस्थापित होऊन

 मुख्यमंत्री पुढे म्हणालेदेशाच्या फाळणीनंतर या समाजाला घरशेतीव्यापार सोडून विस्थापित होऊन भारतात यावे लागले. त्याचप्रमाणे अनेक वर्ष या समाज बांधवांना निर्वासितांच्या शिबिरामध्ये घालवावी लागली. समाजाने आपले दुःख हे  संघर्षाचे शस्त्र बनवले. आज हा समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून देशाच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान देत आहे.

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे देशभरात अभियान राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण ठरत होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावेअशी मागणी सुरू होती. संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi