टेकवारी २.० मध्ये एका हॉलमध्ये अधिकारी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि AI-आधारित प्रशासनाच्या भविष्यावर चर्चा करत होते, तर दुसऱ्या हॉलमध्ये सहभागी मानसिक स्वास्थ्य, निकोप जीवन आणि भावनिक संतुलनाबद्दल शिकत होते. टेकवारी २.० मध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना, आरोग्यदायी अन्न आणि पोषण दर्शविणारी प्रदर्शने देखील होती. या साऱ्यांमुळे मंत्रालयाचे 'त्रिमूर्ती प्रांगण' विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी, लय आणि ऊर्जेने भरून गेले होते.
भविष्यासाठी सज्ज असलेले प्रशासन केवळ तंत्रज्ञानावर उभारता येत नाही. त्यात सहानुभूती, आरोग्य, नैतिकता आणि सर्जनशीलता देखील अंतर्भूत असावी लागते. टेकवारीचे खरोखर लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता. मंत्रालयात ६,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर जिल्ह्या-जिल्ह्यांमधून लाखो कर्मचारी 'लाइव्ह स्ट्रीमिंग'द्वारे जोडले गेले. शिक्षणाच्या प्रवासात कोणताही कर्मचारी मागे राहू नये, ही साधी पण प्रभावी कल्पना त्यामागे होती.
No comments:
Post a Comment