'पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा'
- उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जपणे गरजेचे
- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
'एआय लिविंग लॅब' उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे प्रशिक्षण मिळणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा
मुंबई दि. २१ : आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
No comments:
Post a Comment