भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव नाही
- वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि.२५ : भीमाशंकर अभयारण्याचे राष्ट्रीय उद्यानात रूपांतर केल्यास त्या परिसरातील गावांचे स्थलांतर करावे लागेल, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे भीमाशंकर अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याबाबत कोणताही प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
पुणे येथील भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याबाबत सदस्य अजय चौधरी यांनी विधानसभेत प्रश्न मांडला.
No comments:
Post a Comment