“यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार!”
— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास
यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार
मुंबई, दि. 19 : दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. “बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील, आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment