Thursday, 19 February 2026

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक

 काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक

— बंदरे मंत्री नितेश राणे

 

·         केंद्र-राज्य समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची ग्वाही

 

मुंबईदि. १८ : काजू प्रक्रिया उद्योगनिर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावायासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देत स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 


 

या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मितीला वेग येईलनिर्यातवाढीस प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक आर्थिक विकासाला भक्कम आधार मिळेलअसा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi