मूलभूत बाबींवर लक्ष देण्याची गरज
मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद अरिबम शर्मा यांनी नवकल्पनांवर बोलताना मूलभूत बाबींवर लक्ष देण्याचे आवाहन केले. नवीन तंत्रज्ञान, एआय किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाचे असले तरी त्याआधी लोकसंख्या, पाणी, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन याचे शास्त्रीय नियोजन आवश्यक आहे असे ते म्हणाले.
शर्मा यांनी विकेंद्रीकृत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची गरज अधोरेखित करत पुनर्वापराच्या संकल्पनेला खरी नवकल्पना असल्याचे नमूद केले. तसेच कोणताही प्रकल्प राबवताना राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, पर्यावरणीय आणि कायदेशीर घटकांचा सखोल विचार करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
No comments:
Post a Comment