शासनाने दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी
ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे पणन महासंघाचे आवाहन
मुंबई, दि. 26 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेडचे सरव्यवस्थापक (नाफेड खरेदी) डी.आर. भोकरे यांनी केले आहे.
हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुग, उडिद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरिता ई-पिक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. तसेच खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार असल्याचे पणन महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment