*🌹🌹ज्याप्रमाणे झाडांना पाणी मिळाले नाही तर ती सुकतात अगदी त्याचप्रमाणे मनाला मनाचा आहार मिळाला नाही तर मन जिर्ण होत जाते,अकुशल विचारात रममाण व्हायला लागते...*
इतके सुंदर जीवन मिळुनही या मनात डोकावून बघितले तर कळते की येथे मानसिक समाधान अजिबात नाही. याचे कारण म्हणजे शारिरीक आहाराकडे मनुष्य विशेषत्वाने लक्ष देतो पण मनाच्या आहाराकडे मात्र तो पुर्णपणे दुर्लक्ष करतो.
तर मग मानसिक समाधान कुठुन मिळणार?
यासाठीच शारिरीक आहारासोबतच मनाच्या आहाराचाही विचार करावा लागेल. मनाचा आहार न चुकता घ्यावा लागेल.
*तरचं मन निर्मळ होत जाईल, समाधानी होईल,कुशल विचारात परिवर्तित होत राहील.*
No comments:
Post a Comment