Saturday, 26 April 2025

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचलेआतापर्यंत 800 पर्यटक परत

·         त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

 

मुंबई25 एप्रिल : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असूनत्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहेअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यानपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोलाअमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असूनमहाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नयेयाची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असूनजो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेलत्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असूनत्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यानकाल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आलेतर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवायसुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असूनत्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतीलतसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi