Friday, 11 October 2024

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

 राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

 

मुंबईदि. १० : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

या शोकप्रस्तावात म्हटले आहे कीउद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतोमात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवीद्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हेतर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्तस्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.

श्री. टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केलीती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला.

 मोटारीपासून मिठापर्यंत आणि संगणकापासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षणआरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविडकाळात रतन टाटा यांनी प्रधानमंत्री सहाय्य निधीसाठी तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविडकाळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या 'टाटा मूल्यांशी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तृत्वालाप्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं.

महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योग रत्नहा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव लाभ झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.

टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभोही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली

000


राज्य मंत्रिमंडल की ओर से दिग्गज उद्योगपति रतन टाटा को श्रद्धांजलि

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रस्तुत किया शोक प्रस्ताव

रतन टाटा को भारतरत्न देने के लिए

केंद्र सरकार को अनुरोध करनेवाला प्रस्ताव भी पारित

मुंबई, दि. 10 : दिग्गज उद्योगपति पद्म विभूषण रतन टाटा को आज राज्य कैबिनेट की बैठक में श्रद्धांजलि अर्पित की गई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बैठक में इस संबंध में शोक प्रस्ताव प्रस्तुत किया. इस अवसर पर एक प्रस्ताव भी पारित किया गया जिसमें केंद्र सरकार से रतन टाटा को उनकी उपलब्धियों के लिए भारतरत्न से सम्मानित करने का अनुरोध किया गया.

इस शोक प्रस्ताव में कहा गया कि, उद्यमिता भी समाज निर्माण का एक प्रभावी तरीका है. नए उद्योगों की स्थापना से ही देश को आगे बढ़ाया जा सकता हैलेकिन उसके लिए दिल में सच्ची देशभक्ति और उतनी ही सच्ची चिंता अपने समाज के लिए होनी चाहिए. हमने रतन टाटा के रूप में एक समान विचारधारा वाले सामाजिक कार्यकर्तादूरदर्शी और देशभक्त मार्गदर्शक को खो दिया है. भारत के औद्योगिक क्षेत्र में ही नहीं बल्कि सामाजिक विकास के कार्यों में भी रतन टाटा का योगदान अभूतपूर्व था. वह महाराष्ट्र के सपूत थे. भारत का गौरव थे. आत्म-अनुशासनस्वच्छ प्रशासन और बड़े बडे़ उद्यमों को चलाते समय उच्च नैतिक मूल्यों का पालन करते हुए रतन टाटाने कठोर कसौटियों को पार कर अंतरराष्ट्रीय स्तरपर अपनी और भारत की पहचान बनाई. आज उनके रूप में देश का एक बड़ा स्तंभ ढह गया है.

            टाटा समूह के संस्थापक जमशेदजी टाटा के रतन टाटा परपोते थे. उन्होंने कई वर्षों तक चेयरमैन और बाद में अंतरिम चेयरमैन के रूप में टाटा समूह की देखरेख की. देश के सबसे पुराने टाटा समूह के चैरिटेबल ट्रस्ट के प्रमुख के रूप में उन्होंने बहुत ही परोपकारी रवैये के साथ सेवा की.

रतन टाटा ने नैतिक मूल्यों को कायम रखाउनका कार्य अन्य उद्यमियों और भावी पीढ़ियों के लिए एक मार्गदर्शक के रूप में काम करेगा. वह एक सिद्धांतवादी कर्मयोगी थे. आजादी के बाद देश के पुनर्निर्माण में टाटा समूह ने प्रमुख भूमिका निभाई. इस समूह के माध्यम से रतन टाटाने वैश्विक स्तरपर भारत का परचम लहराया.

 टाटा का नाम कारों से लेकर नमक और कंप्यूटर से लेकर कॉफी-चाय तक कई उत्पादों के साथ गर्व से जुड़ा हुआ है. रतन टाटाने शिक्षास्वास्थ्य और समाज सेवा के क्षेत्र में भी अपना अद्वितीय योगदान दिया.  मुंबई पर 26/11 हमले के बाद उनके द्वारा दिखाई गई दृढ़ता के लिए याद किया जाएगा. रतन टाटाने कोविड काल में प्रधानमंत्री राहत कोष के लिए तुरंत 1500 करोड़ रुपये दिए. साथ ही अपने अधिकांश होटलों को कोविड काल के दौरान मरीजों के लिए उपलब्ध कराया. उनकी महानता सदैव याद रखी जायेगी.

उनमें नवप्रवर्तन और परोपकारिता का अद्वितीय समन्वय था. उन्होंने अपने 'टाटा मूल्योंसे कभी समझौता नहीं किया. वह युवाओं के बीच उपलब्धि और प्रयोगशीलता को प्रोत्साहित करने में हमेशा आगे रहते थे. उन्होंने गढ़चिरौली जैसे दूरदराज के इलाकों में युवाओं की कुशलता को बढावा और रोजगार के अवसर प्रदान करने के लिए एक इनोव्हेशन केंद्र शुरू किया.

महाराष्ट्र सरकार का पहला 'उद्योग रत्नपुरस्कार उन्हें प्रदान करने का भाग्य हमें मिला. उनके मार्गदर्शन का महाराष्ट्र राज्य को हमेशाही लाभ मिला. रतन टाटा के निधन से हमारा देश और साथ ही महाराष्ट्र का कभी भी न भर सकनेवाला नुकसान हुआ है.

टाटा ग्रुप के विशाल परिवार पर आए इस दुःख में राज्य मंत्रिमंडल सहभागी है. प्रार्थना है किउनकी आत्म्या को सद्गती मिलें. देश के इस महान सपूत को महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से राज्य मंत्रिमंडल के माध्यम से भावभीनी श्रद्धांजलि.

0000

 


 

Maharashtra Cabinet pays tribute to Veteran Industrialist Ratan Tata

Chief Minister Eknath Shinde proposes the condolence motion

Proposal for requesting the Centre to confer Bharat Ratna to Ratan Tata

Mumbai, October 10: The State Cabinet on Thursday paid condolences to the Veteran Industrialist Ratan Tata at its cabinet meeting held here. Chief Minister  Eknath Shinde proposed the proposal for condolence. The Maharashtra Cabinet passed the resolution urging the Central Government to confer the highest civilian award Bharat Ratna to Ratan Tata, keeping his contribution in view.

It is stated in the condolence motion that entrepreneurship is also an effective way of formation of a society and the Nation can be taken on the path of progress with the installation of new industries but for that honesty towards the society and extreme patriotism are essential. The Nation has lost a visionary and patriotic leader of such thoughts in the form of Ratan Tata. The contribution made by Shri Tata had been phenomenal not only in the industrial sector of India but also in social development He was the son of Maharashtra. Shri Tata was the pride of India. This visionary industrial Tycoon has created India's and his own impression at the International level due to his self- discipline, clean administration and his high level ethical values during his entire life while looking after the huge extended enterprises. The nation has lost a ‘Major Pillar; in the form of Ratan Tata.

 Ratan Tata was the great grandson of Jamshedji Tata, the founder of the group. He looked after the Tata Group for a number of years in the capacity of Chairman and later on, as interim Chairman. He had performed his duty with a philanthropic approach while working with the Charitable Trust of Tata Group -one of the oldest Trusts in the Nation.

The ethical values of Ratan Tata had set an example and will be serving as a beacon for upcoming and budding entrepreneurs and next generation in the industrial sector. He was a man of principles. The Tata Group was instrumental in the reconstruction of the Nation in the post- independence era. Ratan Tata kept the Indian flag flying high at the global level through the medium of the Tata Group.

The brand of Tata is associated with pride along with numerous productions, right from cars to salt and computers to tea and coffee. The contribution made by Ratan Tata in the field of education, health and social sector is unique, remarkable and admirable.

After the 26/11 attacks on Mumbai, the role played by Ratan Tata as a staunch personality will be ever remembered. During the Covid-19 period, this philanthropist Industrialist has immediately contributed 1500 crore rupees to the Prime Minister Assistance fund. He also made available a maximum of his hotels for the patients in the Covid period. This contribution can never be forgotten.

Ratan Tata had a rare and unique combination of innovation and benevolence. He never compromised with the values of ‘Tata Values'. It was Shri Ratan Tata who started the innovation center in the remote areas of district like Gadchiroli for giving a fillip to the skill development of the youth and providing them employment opportunities.

The Maharashtra government was lucky enough to honor him with the first Udyog Ratna award. Maharashtra was always benefited due to his guidance. The passing away of Ratan Tata is a huge and irreparable loss to the Nation and Maharashtra. The cabinet is standing with the huge extended family of Tata Group in this time of grief. We pray that his soul rests in peace.

The State cabinet pays this son of the Nation a heartfelt tribute on behalf of all the citizens of Maharashtra.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi