🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*हळू हळू एक एक शब्द वाचा. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.*
*_¶ "अश्रु" सांगून जातात, "दुःख" किती आहे ?*
*._¶ "विश्वास" सांगून जातो, "जोडीदार" कसा आहे ?*
*._¶ "गर्व" सांगून जातो, "पैशाचा माज" किती आहे ?*
*._¶ "संस्कार" सांगून जातात, "परिवार" कसा आहे ?*
*._¶ "वाचा" सांगून जाते, "माणूस" कसा आहे ?*
*._¶ "संवाद" सांगून जातात, "ज्ञान" किती आहे ?*
*._¶ "ठेच" सांगून जाते, "लक्ष" कुठे आहे ?*
*._¶ "डोळे" सांगून जातात, "व्यक्ती" कशी आहे ?*
*._¶ "स्पर्श" सांगून जातो, "मनात" काय आहे ?*
*._¶ आणि "वेळ" दाखवते, "नातेवाईक" कसे आहेत.*
*._¶ भावकीतली चार माणसं "एका दिशेने" तेव्हाच चालत असतात. जेव्हा पाचवा खांद्यावर असतो.*
*._¶ संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की "लोक काय म्हणतील" ? आणि शेवटी हेच लोक म्हणत असतात. की" "राम नाम सत्य है "..*
*._¶ माणसाची "कदर" करायची असेल. तर 'जिवंतपणीच' करा. कारण 'तिरडी' उचलण्याच्या वेळी 'तिरस्कार' करणारे सुद्धा 'रडतात.'*
*._¶ मेल्यावर माणूस चांगला होता. असं म्हणण्याची 'प्रथा' आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही. हीच खरी 'व्यथा' आहे.*
*._¶ म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..*
*._¶ चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा.जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते.*
*_¶ आपल्या सोबत असलेली सर्व संम्बंधातील माणसे मनापासून ओळखा आणि सर्वांशी प्रेमाने व आदराने वागा. हा जन्म पुन्हा नाही.हरी ॐ.* 🌹
No comments:
Post a Comment