Wednesday, 25 October 2023

चांगलं द्या, चांगलंच मिळेल*

 *चांगलं द्या, चांगलंच मिळेल*  


एकदा श्रीकृष्ण व अर्जुन  एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णला बोलतो मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे, त्या साठी तू माझी मदत कर. कृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकाच धोशा लावतो की मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

 कृष्ण म्हणतो ठिक आहे मी तुला एक संधी देतो पण माझी पण एक अट आहे मी तुला जी संधी देईन तीच संधी कर्णाला सुद्धा देईन अणि ह्या परीक्षेत तू कर्णा पेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन कृष्णाची ही अट मान्य करतो. 

    कृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो ,आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

  लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

  मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.

लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

  पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

   अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

   लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

 आता अर्जून अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 

 शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही. 

  मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......

 या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....

  या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. 

 एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

  अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... 

 अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!  

   कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

  आपले कुणी कौतुक करतंय.....गुणगान गातंय......हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

  देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....

शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....

म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.

कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............                                                    *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार.कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगल द्या पदरी चांगलंच मिळेल.*

"काय चुकलं" हे शोधायला हवं,

 पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.....

*🌷 राम कृष्ण हरी 🌷*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi