Wednesday, 16 August 2023

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक 21 अभंगांच्या 'अभंग एकविशी' पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

 जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक 21 अभंगांच्या

'अभंग एकविशीपुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

 

'अभंग एकविशीपुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलनसर्वधर्मसमभावाचेसत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचतील उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

            मुंबईदि. 16 : जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून 21 अभंग निवडून ते 'अभंग एकविशीपुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. 'गाथा परिवारआणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित 'अभंग एकविशी-तुकोबारायांचीपुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला.

            'गाथा परिवारआणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी निवासस्थानी झाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळसहकारमंत्री दिलीप वळसे-पाटीलक्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळखासदार सुनील तटकरेराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरआमदार अमोल मिटकरीविक्रम काळेसतीश चव्हाणनितीन पवार, किरण लहामटेगाथा परिवाराचे अविनाश महाराज काकडेअशोक महाराज काळेतुलसीदास खिरोडकरराजु चिमणकरनंदकिशोर चिपडेअनंत गावंडे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीजगतगुरु संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. त्यांनी चारशे वर्षांपूर्वी रचलेले अभंग आजच्या आधुनिक युगातही तितकेच समर्पकव्यवहार्यमार्गदर्शक आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग मानवी जीवनावरील महाभाष्य आहेत. या महाभाष्यातील 21 अभंग निवडण्याचे आणि 'अभंग एकविशीपुस्तिकारुपाने प्रसिद्ध करण्याचे कठीण काम आमदार श्री. मिटकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

            'अभंग एकविशी- तुकोबारायांचीपुस्तिका प्रकाशनाच्या उपक्रम प्रत्यक्षात आणल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'गाथा परिवारतसेच आमदार अमोल मिटकरी व सहकाऱ्यांच्या अभिनंदन केले. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या प्रचार-प्रसारासाठी  'गाथा परिवार', आमदार श्री. मिटकरी आणि आपल्यापैकी अनेक जण करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.

            'अभंग एकविशीपुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलनसर्वधर्मसमभावाचेसत्यशोधक विचारशेतकरीकष्टकरीसैनिक वर्गाला दिलेला संदेशमानवी मूल्ये रुजवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न या साऱ्या गोष्टीशालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतसमाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचतीलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

०००

 

 

वृत्त क्र. 275

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi