Friday, 11 September 2026

महाराष्ट्रातील बायोचार, कृषिवनीकरण आणि मृदा कार्बन वाढविणे यांसारख्या निसर्गाधारित उपाययोजनांशी

 महाराष्ट्रातील बायोचार, कृषिवनीकरण आणि मृदा कार्बन वाढविणे यांसारख्या निसर्गाधारित उपाययोजनांशी संबंधित संभाव्य प्रकल्पांवरील श्वेतपत्रिका मे 2026 मध्ये युनायटेड किंग्डम येथे आयोजित कार्बन रिमूव्हल्स इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्हमध्ये सादर करण्यात आली. यानंतर न्यूयॉर्क क्लायमेट वीक 2026 च्या पार्श्वभूमीवर 22 सप्टेंबर रोजी संभाव्य गुंतवणूकदारांच्या समूहासोबत चर्चा आयोजित करण्यात आली आहे.

 

            महाराष्ट्राला शाश्वत विमान इंधन (एसएएफ) उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या अनुषंगाने सीकिनेटिक्स आणि स्मार्ट फ्रेट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक श्वेतपत्रिका तयार करण्यात आली असून, महाराष्ट्र एसएएफ आघाडी स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत या आघाडीला मूर्त स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

 

            या परिषदेत जाहीर झालेल्या गुंतवणूक उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन व्यवस्थापन, कृषी मूल्यसाखळी आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच राज्याच्या हरित अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली

महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना

 

            मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत आहे.या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरम 2026 मध्ये राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन रिमूव्हल, स्वच्छ इंधन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक घोषणा करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यातील हरित पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा उत्पादन, शाश्वत शेती आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

 

            महाप्रीत आणि सुगम-सीएसएस यांच्या भागीदारीतून, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाल्याच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये (क्लस्टर्समध्ये) 100 सौरऊर्जेवर चालणारी सूक्ष्म शीतगृहे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, 'आयकार्ट' आणि 'आयकार्ट राईज फाउंडेशन' यांच्या माध्यमातून, राज्यातील 10 हून अधिक क्षेत्रांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी गटांसाठी आधीच उभारण्यात आलेल्या 50 सूक्ष्म शीतगृहांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी सहाय्य दिले जात आहे. यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

कार्बन रिमूव्हल क्षेत्रात वराह या कंपनीने 100 कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीची

 कार्बन रिमूव्हल क्षेत्रात वराह या कंपनीने 100 कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीची, तसेच पुढील तीन वर्षांत ती एक हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. विदर्भात 18 बायोमास गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातून 15 वर्षांच्या कालावधीत 20 लाख टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइड शोषणाची क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पातून उत्पादित बायोचार कार्बन क्रेडिटपैकी एक लाख टनांहून अधिक कार्बन रिमूव्हल क्रेडिट खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट सोबत करार करण्यात आला

मराठी उद्योजकांना एकत्र आणणार

 मराठी उद्योजकांना एकत्र आणणार

            जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांत काम करत आहे. या सगळ्या शक्तीची एकत्रित ताकद महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे. जगभरातील मराठी माणसांची वज्रमूठबांधण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करताना यासाठी एक व्यापक अपेक्स बॉडी उभारण्याच्या दिशेने काम करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून पुढाकार घेण्यास सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

0000

महाराष्ट्रातील बायोचार, कृषिवनीकरण आणि मृदा कार्बन वाढविणे यांसारख्या निसर्गाधारित उपाययोजनांशी

 महाराष्ट्रातील बायोचार, कृषिवनीकरण आणि मृदा कार्बन वाढविणे यांसारख्या निसर्गाधारित उपाययोजनांशी संबंधित संभाव्य प्रकल्पांवरील श्वेतपत्रिका मे 2026 मध्ये युनायटेड किंग्डम येथे आयोजित कार्बन रिमूव्हल्स इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्हमध्ये सादर करण्यात आली. यानंतर न्यूयॉर्क क्लायमेट वीक 2026 च्या पार्श्वभूमीवर 22 सप्टेंबर रोजी संभाव्य गुंतवणूकदारांच्या समूहासोबत चर्चा आयोजित करण्यात आली आहे.

ब्रिटिश कंपन्यांसाठी मोठ्या संधी

 ब्रिटिश कंपन्यांसाठी मोठ्या संधी

            इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, मेडि-सिटी, एरो-सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि फिनटेक हब यांसारख्या प्रकल्पांना चालना दिली जात आहे. ब्रिटनमधील नामांकित विद्यापीठांनी महाराष्ट्रात शैक्षणिक केंद्रे सुरू करून संयुक्त अभ्यासक्रम आणि संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ब्रिटिश कंपन्यांनी पुण्यात संशोधन आणि डिझाइन, मुंबईत वित्तीय व्यवस्था, छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन आणि वाढवण बंदरातून निर्यात अशा संपूर्ण मूल्य साखळीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राकडे स्केल, स्पीड आणि सस्टेनेबिलिटी आहे. ब्रिटनने आपले तंत्रज्ञान, डिझाइन आणि हरित भांडवल महाराष्ट्रात आणावे असेही ते म्हणाले.

            वर्ल्ड लीडरशिप फोरमचे संस्थापक नचिकेत जोशी यांनी पण आपले विचार मांडले.


‘एमओयू म्हणजे केवळ घोषणा नाही’

 एमओयू म्हणजे केवळ घोषणा नाही

            गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात निर्णय प्रक्रियेला वेग देण्यात येत असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वॉर रूमचा उल्लेख केला. सुमारे ५० महत्त्वाच्या प्रकल्पांवर नियमित देखरेख केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी जवळपास ७५ टक्के करार प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित होत असल्याचे ते 

Featured post

Lakshvedhi