Thursday, 27 August 2026

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा

 गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी

सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून मंडळांच्या सूचनांचाही त्यात समावेश करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

            मुंबईतील सुमारे 1 हजार 850 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि

 महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

 

गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

 गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी;

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

                                                                - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होण गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

            गणेशोत्सव-2026 निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार राज्यभर पुढे नेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा जपताना शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकासह प्रशासन, मंडळे आणि विविध संघटनांवर असल्याचे ते म्हणाले.

            महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उमेद पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्राची कामगिरी:

  पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्राची कामगिरी:

 

            ३८ हजार महिलांना आर्थिक आधार: उमेद अभियानाने गेल्या पाच वर्षांत PMFME योजनेच्या अंतर्गत राज्यातील ३८,००० स्वयं सहाय्यता समूहातील सदस्यांना सुमारे १३६ कोटी रुपयांचे बीज भांडवल यशस्वीरीत्या वितरित केले आहे.

 

 ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना: या मिळालेल्या बीज भांडवलाच्या मदतीने ग्रामीण भागातील हजारो महिलांनी स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. यामुळे महिलांना नियमित उत्पन्न, रोजगार आणि स्वावलंबनाची शाश्वत संधी उपलब्ध झाली आहे.

 

 राष्ट्रीय स्तरावर दखल: महाराष्ट्रात 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना शाश्वत उपजीविकेकडे नेण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा करण्यात आली.

 

हा पुरस्कार म्हणजे राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवणाऱ्या स्वयं सहाय्यता समूहातील सर्व कष्टकरी महिलांच्या उल्लेखनीय परिश्रमांची पोचपावती आहे. या पुरस्कारामुळे राज्यभरातील आमच्या भगिनींना अजून जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. उमेद अभियानाच्या महिलांना प्रेरणा मिळून १ कोटी लखपती दीदी बनविण्याच्या संकल्पाला हातभार लागणार आहे. असल्याचे मत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी यावेळी व्यक्त 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी; ‘उमेद’ अभियानाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी;

उमेदअभियानाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, 26 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील (पीएमएफएमइई) 'बीज भांडवल' (Seed Capital) घटकाच्या अत्यंत प्रभावी अंमलबजावणीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) राष्ट्रीय स्तरावरील ‘Best Performance State’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

नवी दिल्ली येथील 'इंडिया हॅबिटॅट सेंटर' (India Habitat Centre) येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा राष्ट्रीय पुरस्कार 'उमेद' अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील यांनी स्वीकारला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी उमेद अभियानाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले.

बचत गटातून उद्योजकतेकडे ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा प्रवास

 बचत गटातून उद्योजकतेकडे

            ‘उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा प्रवास बचत आणि कर्जाच्या चौकटीपलीकडे जाऊन उद्योजकतेकडे होत आहे. व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेशी जोडणी यासाठी संस्थात्मक पाठबळ मिळत असल्याने महिलांची निर्णयक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन वाढत आहे. ग्रामीण भागातच रोजगार आणि नियमित उत्पन्नाच्या संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लागत आहे. त्याचवेळी गावातील नागरिकांनाही आवश्यक वस्तू आणि सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.

            महिला स्वयंसहाय्यता समूहांची सामूहिक ताकद, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला संस्थात्मक पाठबळ यांचा संगम घडवून उमेदअभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच गावच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी देत आहे. शेतीतील यांत्रिकीकरणापासून व्यवसायाच्या व्यवस्थापनापर्यंत महिलांचा वाढता सहभाग हा ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या आर्थिक चित्राचा महत्त्वपूर्ण भाग ठरत आहे.

0000

चाकण-भोसरीच्या औद्योगिक भरारीला नवी झेप ▪ ४९ 'एमएसएमईं'च्या सामंजस्य करारातून २,३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित

 महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला 'एमएसएमई' क्षेत्राची ताकद मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

चाकण-भोसरीच्या औद्योगिक भरारीला नवी झेप

४९ 'एमएसएमईं'च्या सामंजस्य करारातून २,३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित

उत्पादनवाढीसह  रोजगारांच्या संधी

 

मुंबई, दि. २६ : चाकण-भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणा-या ४९ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसोबतच्या (एमएसएमई) सामंजस्य कराराच्या माध्यमातून २ हजार ३२०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादनक्षमता वाढण्यासोबतच हजारो रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातील  औद्योगिक परिसंस्थेलाआणखी बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योग (गुंतवणूक व सेवा विभाग) आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे अवर सचिव विनोद मेंढे, आयुक्त (एमएसएमई) प्रेरणा देशभ्रतार, विशेष आयुक्त (मैत्री) वैभव वाघमारे तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi