Friday, 15 May 2026

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने

 भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही संचालनालयाने नमूद केले आहे. जीवनशैलीतील बदलांच्या अनुषंगाने स्थानिक पर्यटनाला चालना देणे यांसारख्या उपक्रमांचा अवलंब करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या माहितीचे सहकार्य करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तात्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.


भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी

 संस्थांनी तत्काळ किंवा अपरिहार्य असल्यासच परदेश दौरे करावेत. तसेच महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त इतर बैठका प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याऐवजी ऑनलाइन माध्यमातून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही संचालनालयाने नमूद केले आहे. जीवनशैलीतील बदलांच्या अनुषंगाने स्थानिक पर्यटनाला चालना देणे यांसारख्या उपक्रमांचा अवलंब करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या माहितीचे सहकार्य करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तात्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी इंधन बचतीबाबत जनजागृती उपक्रम राबवावे

 विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी

इंधन बचतीबाबत जनजागृती उपक्रम राबवावे

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         सार्वजनिक वाहतूक वापर, इंधन बचत आणि स्वदेशी वस्तूंच्या

वापराबाबत उच्च शिक्षण संचालनालयाच्या सूचना

मुंबई, दि. १४: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या आवाहनानुसार देशाची आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह, परदेशी दौरे आणि जीवनशैलीत बदल याबाबत उच्च शिक्षण संचालनालय यांनी विद्यापीठ, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, यासंदर्भात सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना कळविण्यात आले आहे. शक्य असेल तेथे खासगी वाहनांचा वापर टाळून मेट्रो रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. यामुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. पेट्रोल आणि डिझेलचा मर्यादित वापर करणे, ऊर्जेची बचत वाढविणे आणि यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. कार पूलिंग सारख्या संकल्पनांनाही प्रोत्साहन द्यावे, असे सांगण्यात आले आहे.

 संस्थांनी तत्काळ किंवा अपरिहार्य असल्यासच परदेश दौरे करावेत. तसेच महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त इतर बैठका प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याऐवजी ऑनलाइन माध्यमातून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Thursday, 14 May 2026

देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणाशासन निर्णय (क्र. 202605131138212501

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय (क्र. 202605131138212501) कृषी विभागाने जारी केला आहे.

देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने पुणे येथील कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या केंद्राच्या बळकटीकरणालाही यापूर्वी शासनाने मान्यता दिली होती.

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता

 पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास

अजितदादा पवारयांचे नाव देण्यास शासनाची मान्यता

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. १३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संवर्धन, पेशवे स्मारक ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कासव संवर्धन, पेशवे स्मारक ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, पर्यटनच्या ज्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे त्या कामांना निधी पर्यटन विभागाकडून देण्यात यावीत. केंद्र शासनाकडे स्वदेश दर्शन योजनेसाठी पर्यटन विभागाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पर्यटनाच्या कामांना निधीची मागणी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करावेत.

0000

रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना

 मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाची कामे गतीने करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटन मधील जी प्रलंबित कामे आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे हे लक्षात घेवून पर्यटन विभागाने वित्त विभागाकडे जिथे निधीची आवश्यकता आहे त्याची मागणी करावी. पर्यटन विभागाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीतून कामांची प्राथमिकता लक्षात घेवून निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. व स्टार गेझिंगचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यासाठी कार्यवाही करावी. स्वदेश दर्शन योजना प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi