Thursday, 14 May 2026

रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना

 मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाची कामे गतीने करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटन मधील जी प्रलंबित कामे आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे हे लक्षात घेवून पर्यटन विभागाने वित्त विभागाकडे जिथे निधीची आवश्यकता आहे त्याची मागणी करावी. पर्यटन विभागाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीतून कामांची प्राथमिकता लक्षात घेवून निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. व स्टार गेझिंगचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यासाठी कार्यवाही करावी. स्वदेश दर्शन योजना प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi