Friday, 15 May 2026

भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी

 संस्थांनी तत्काळ किंवा अपरिहार्य असल्यासच परदेश दौरे करावेत. तसेच महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त इतर बैठका प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याऐवजी ऑनलाइन माध्यमातून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही संचालनालयाने नमूद केले आहे. जीवनशैलीतील बदलांच्या अनुषंगाने स्थानिक पर्यटनाला चालना देणे यांसारख्या उपक्रमांचा अवलंब करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या माहितीचे सहकार्य करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तात्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi