Sunday, 10 May 2026

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

 एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश

 

        मुंबईदि. ८ : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने"अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने"अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी

१५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि.०८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यावरील असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णयातील इतर अटी व शर्ती लागू राहणार असून लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.

 

या यात्रेसाठी प्रवासनिवास व भोजनाची सुविधा शासन नियमानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच यात्रेत सहभागी होता येईल. ७५ वर्षांवरील अर्जदारांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एका व्यक्तीस सोबत नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अपूर्ण अथवा अपात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तसेच अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

  

ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

 

मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तथापिआधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. तसेच अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे.

 

या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी  २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहरप्रशासकीय इमारतभाग-१चौथा मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई – ४०००७१ या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग · विविध नृत्याविष्कार सादर

 टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग

·        विविध नृत्याविष्कार सादर

 

मुंबईदि. ८ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक-वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या दिवशी संस्कृतीरंग कार्यक्रमातून विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले.

 

दि. ४ ते ८ मे २०२६ या कालावधीत  ‘टेक- वारी २.०’  अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रम झाला. शेवटच्या दिवशी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. संध्या पुरेचा  संगीत नाटक अकादमीच्या टीमने संस्कृतीरंग  कार्यक्रम सादर करून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची दाद मिळवली. कार्यक्रमास  सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधामहाराष्ट्र सदन नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमलामुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मिनाक्षी अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमात गणेशवंदनशास्त्रीय संगीत नृत्यओडिसीभरतनाट्यमशिवस्तुतीबाल्या,  पंढरपूर वारी यासह विविध अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपराभावविश्व आणि कलात्मकता प्रभावीपणे उलगडण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृतsupport@mahafyjcadmissions.in

 प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

 

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया

 नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणीभाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅप फेरी-1 ची अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मे दरम्यान पार पडणार असून26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असूनएसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.

 

टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

 टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

कौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असूनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात चार मेपासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. डीपीडीपीनवीन तंत्रज्ञानसायबर सुरक्षा आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासासाठी टेक वारीचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कर्मयोगी भारत 2 एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या सप्ताहात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार 

Featured post

Lakshvedhi