Tuesday, 31 March 2026

नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

 नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर

एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

महाराष्ट्रातील नागपूरचंद्रपूरभंडारावर्धागडचिरोलीअमरावतीअकोलालातूरधाराशिवसोलापूरजळगावसिंधुदुर्गनांदेडठाणेपालघरनंदुरबारसोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसारमहाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडाराचंद्रपूरनागपूरगडचिरोली आणि गोंदिया.

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होतेत्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कीअफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नसल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

 


राज्यात ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

 राज्यात  ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असूनत्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातातज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजेकाही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असूनगडचिरोलीभंडाराचंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग

 हत्तीरोग निर्मूलनासाठी ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिनडीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातीलविशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेचदेशातून हत्तीरोग निर्मूलन करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीतही  मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहकार्याने, आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० आयोजित

 आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० मध्ये ४०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

            रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहकार्यानेआयडिएशन कॉम्पिटिशन ३.० आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ५० हून अधिक महाविद्यालयांमधील १३०  गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेतून तीन विजेते लवकरच घोषित केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणेत्यांना जोपासणे आणि वास्तविक जगातील आव्हानांवर उद्योजकीय उपाय विकसित करण्यासाठी सक्षम करणेहे या स्पर्धेचे  उद्दिष्ट आहे.२०२४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय संस्कृती रुजवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील कल्पनांचे रूपांतर शाश्वत उद्योगांमध्ये करण्यास मदत केली जाते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे रूपांतर प्रभावी स्टार्टअपमध्ये करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोज्यामध्ये त्यांना मार्गदर्शन, निधीच्या संधी आणि इनक्युबेशन सपोर्ट मिळतो. आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० हे 'प्री-इनक्युबेशन प्रोग्राम’च्या माध्यमातून या संकल्पनेला पुढे नेत  हा कार्यक्रम अगदी सुरुवातीच्या कल्पनेपासून ते सक्षम स्टार्टअप विकसित करण्यापर्यंत मदत करतो. यामध्ये नाविन्यपूर्णतासमस्या निवारण आणि उद्योजकीय विचारसरणीवर भर दिला जातोज्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक साधने आणि इकोसिस्टम सपोर्ट मिळतो.

या कार्यक्रमातून वैचारिक स्तरावर संरचित उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येते. तज्ज्ञ मार्गदर्शक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसह सखोल स्टार्टअप बूटकॅम्प, इतर नाविन्यपूर्ण विचारवंत आणि संस्थापकांसोबत सहयोग आणि नेटवर्किंगच्या संधी मिळते. स्पर्धा पूर्ण केल्यावर सहभागाचे ई-प्रमाणपत्र मिळते. आश्वासक कल्पनांसाठी 'सीड ग्रांटस्वरूपात निधी मिळवण्याची संधीही मिळत असून, मुंबई येथील आय स्पार्क इनक्युबिशेन फाउंडेशन मध्ये इनक्युबेशनसाठी पात्र होण्याची संधी मिळणार आहे.

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल

 आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल

           -मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई,दि.३०: कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० ही उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची व नवकल्पनांना चालना देणारा उपक्रम ठरेल असे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण सोसायटी आणि आयस्पार्क फांउडेशन यांच्या पुढाकाराने आयडिएशन कॉम्पीटीशन ३.० ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.


अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नवकल्पनांना चालना देणा-या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील यांनी राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती दिली.


रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी इनक्युबिशेनसाठी आवश्यक असलेली सर्व मदत विद्यापीठाच्या वतीने दिली जाईल. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता सहभाग पाहून स्टार्टअप इकोसिस्टमला मिळणारे बळ स्पष्ट होत आहे असेही त्या म्हणाल्या.

शिवशाही प्रकल्पाला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी यासाठी एसआरएच्या धर्तीवर

 केवळ घरेच नव्हेतर झोपडपट्टी भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एमएसएमई पार्क उभारण्यात यावे. तसेचशासनाच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीणयोजनेच्या धर्तीवर महिलांसाठी 'लघु उद्योग प्रकल्पसुरू करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

शिवडी येथील राहुलनगर मधील इमारत क्र. २ दुरुस्तीच्या विषयावर यावेळी चर्चा झाली. ७२ सदनिकांच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ४ कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. ९ खासगी विकासकांकडे संक्रमण सदनिकांचे १४३.४४ कोटी भाडे थकीत असून वसुली सुलभ व्हावी म्हणून वार्षिक भाडेवाढ १० टक्के ऐवजी ५ टक्के करणे आणि विलंब शुल्क १६ टक्के ऐवजी ८ टक्के करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

शिवशाही प्रकल्पाला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी यासाठी एसआरएच्या धर्तीवर मनुष्यबळ निर्मितीचा सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त

'शिवशाही पुनर्वसनप्रकल्पाला बळकटी

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. ३० : बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होतीतोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खासगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात 'विशेष संयुक्त उपक्रम' (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'शिवशाही पुनर्वसन प्रकल्पा'ला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Featured post

Lakshvedhi