Wednesday, 11 March 2026

राज्यपाल वर्मा द्वारा छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन, चैत्यभूमि और सावरकर स्मारक का भी दौरा

 राज्यपाल वर्मा द्वारा छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन,

चैत्यभूमि और सावरकर स्मारक का भी दौरा

 

राज्यपाल पद का कार्यभार संभालने के बाद पहले ही दिन महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने मुंबई के दादर स्थित छत्रपती शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर उन्हें नमन किया। इस अवसर पर मुंबई की महापौर रितू तावडे भी उपस्थित थीं।

इसके बाद राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने चैत्यभूमि जाकर भारत रत्न डॉ बीआर आंबेडकर की स्मृति को अभिवादन किया। राज्यपाल की उपस्थिति में त्रिशरण बुद्ध वंदना का आयोजन किया गया।

इस अवसर पर मुंबई की महापौर रितू तावडेभन्ते डॉ राहुल बोधी महाथेरोडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिति के महासचिव नागसेन कांबळे उपस्थित थे। भारतीय बौद्ध महासभा के प्रताप कांबलेभिकाजी कांबले और प्रतीक कांबले ने राज्यपाल को संविधान की प्रति भेंट की।

राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक का भी दौरा किया और वीर विनायक दामोदर सावरकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें अभिवादन किया। इस अवसर पर मुंबई की महापौर रितू तावडेपूर्व सांसद राहुल शेवालेस्मारक के कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तथा कोषाध्यक्ष मंजिरी मराठे उपस्थित थे। स्मारक की ओर से राज्यपाल को वीर सावरकर की प्रतिमा तथा सावरकर पर आधारित ग्रंथ भेंट किए गए।

नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचे निश्चित धोरण तयार करण्याचे आदेश

 गृहराज्यमंत्री  डॉ. पंकज भोयर म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचे निश्चित धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्यांच्या  हद्दीतील गुन्हयांची संख्यालोकसंख्येची घनताविशेष भौगोलिक स्थानमोठी धार्मिक व पर्यटन स्थळेसुरक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाची ठिकाणे, औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे जीवनमान पद्धतीत झालेला बदलत्यानुसार गुन्ह्यांचे बदललेले स्वरुप महत्त्वाचे ठरते आहे.

            यासह तंत्रज्ञानाचा समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार व वाढता वापर त्या माध्यमातून होणारे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे या अनुषंगाने नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस स्टेशन निर्माण केल्यानंतर त्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचेही राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले.

            या बैठकीत राज्यातील नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावांची सद्यस्थितीनिकषांमधील आवश्यक सुधारणा तसेच मनुष्यबळाच्या उपलब्धते संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली

नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला सुधारित धोरणाच्या आधारे गती देण्यात येणार

 नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला सुधारित धोरणाच्या आधारे गती देण्यात येणार

-         गृह राज्यमंत्री (ग्रामीण)डॉ. पंकज भोयर

 

·         वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबईदि.११ : पोलीस ठाणे निर्मितीबाबत सुधारित धोरण तयार करण्यास गती देण्यात यावीनवीन पोलीस ठाणेची निर्मिती करताना अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरतापोलीस कर्मचाऱ्यांवर वाढणारा कामाचा ताण यामुळे वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले.  

            यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मंत्रालयात गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस सर्वश्री आमदार समीर कुणावारअमोल पाटीलसुहास बाबर तसेच विशेष पोलीस निरीक्षक सुवेज हकगृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यासह जळगाववर्धा आणि सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

बालसुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी १३ मार्च रोजी ‘महा-संकल्प’ नेतृत्व संवादाचे आयोजन

 बालसुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी १३ मार्च रोजी

महा-संकल्प’ नेतृत्व संवादाचे आयोजन

 

मुंबईदि. ११: राष्ट्रीय ध्येय विकसित भारत @२०४७’ च्या दिशेने वाटचाल करताना बालकांचे सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडविण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) आणि चाइल्डफंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महा-संकल्प’ या उच्चस्तरीय नेतृत्व संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १३ मार्च २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (JWCC), बीकेसीयेथे होणार आहे.

डिजिटल युगात मुलांसमोर निर्माण होणारे विविध धोके आणि आव्हाने लक्षात घेता मुलांच्या जगण्याचाविकासाचासंरक्षणाचा आणि सहभागाचा अधिकार सुरक्षित ठेवणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेमाहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेतसेच गृहराज्य मंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृहराज्य मंत्री (शहर) योगेश कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.

या नेतृत्व संवादात आरोग्य विभागशालेय शिक्षण विभागसायबर क्राईम विभागमाहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध आयटी कंपन्यांचे प्रतिनिधीकॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामांकित शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व सहभागी होणार आहे. बालकांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर या मंचावर सखोल चर्चा होणार असूनभविष्यातील प्रभावी धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.

आजच्या डिजिटल युगात मुले इंटरनेट आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असताना त्यातून होणारे मानसिक व शारीरिक शोषण ही एक अदृश्य पण अत्यंत गंभीर समस्या बनत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासननागरी समाज आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांनी एकत्र येऊन या विषयावर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण

 वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण

 

यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते 2023-24 ते 2025-26 या कालावधीतील वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे तसेच विविध कला पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार सन 2023-24 साठी शिल्पकार किशोर ठाकूर यांना, 2024-25 चा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना तर 2025-26 पुरस्कार चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस यांच्या वतीने त्यांच्या कन्या रूपा देवधर यांनी स्वीकारला. ज्येष्ठ कलाकार पुरस्कार चित्रकार विलास शिंदे यांना देण्यात आला.

कला जीवन गौरव पुरस्कारासाठी 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्हज्येष्ठ कलाकार पुरस्कारासाठी दीड लाख रुपये व सन्मानचिन्हतर विभागीय पुरस्कारांसाठी 75 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी विभागीय स्तरावरील 15 पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी राज्यभरातून एकूण 1266 कलाकृती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 268 उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी गॅलरीतील प्रदर्शित कलाकृतींची पाहणी केली.

कलाक्षेत्रातील पदविका परीक्षांना बोर्ड परीक्षेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

 संचालनालयाच्या वतीने कलाक्षेत्रातील पदविका परीक्षांना बोर्ड परीक्षेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या बोर्ड परीक्षांसाठी संचालनालयाशी 200 पेक्षा अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. तसेच सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि त्याला यशही मिळाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही कलाक्षेत्रातील ऐतिहासिक व जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.


कलाकारांना ईश्वरीय देणगी लाभलेली असते. त्यांच्या सृजनातून चित्रकला, शिल्पकला यांसारख्या विविध माध्यमांतून भारताचे सांस्कृतिक प्रतिबिंब उमटत असते, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.


 

आर्थिक प्रगतीबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची

 आर्थिक प्रगतीबरोबरच कलाक्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची

- मंत्री चंद्रकांत पाटील

65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण

 

मुंबईदि.10:- कोणताही समाज कलाक्रीडा आणि साहित्याच्या विकासामुळेच मोठा होत असतो. आर्थिक प्रगतीबरोबरच या क्षेत्रांतील प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. शासनाने प्रदर्शन आणि विविध पुरस्कारांच्या माध्यमातून कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असून पुरस्कारांच्या रकमांमध्येही भरीव वाढ करण्यात आली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू हीमकुमार चटर्जीकला संचालनालयाचे संचालक डॉ किशोर इंगळेपद्मश्री वासुदेव कामतज्येष्ठ शिल्पकार किशोर ठाकूर, आदी उपस्थित होते.

राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले असून यावेळी कला जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi