Thursday, 19 February 2026

हवामान लवचिकतेसाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक – महापौर रितु तावडे

 हवामान लवचिकतेसाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक – महापौर रितु तावडे

            शहराचा विकासवाढ आणि हवामान जबाबदारी या एकमेकांपासून वेगळ्या न ठेवता समांतर आणि समन्वयाने पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे मुंबईच्या महापौर श्रीमती रित तावडे यांनी सांगितले. हवामान लवचिकता केवळ शासनापुरती मर्यादित नसून सार्वजनिक संस्था, खाजगी उद्योग, वित्तीय भागीदार, संशोधन संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य होईल. यासाठी मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारी, नवोन्मेषी वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य आणि नागरिकांच्या वर्तनातील सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृतीची गरज –

 पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृतीची गरज – मंत्री पंकजा मुंडे

            पर्यावरण संरक्षणासाठी ठोस आणि व्यापक पातळीवर कृती करण्याचे आवाहन करत पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या कीभूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरणाचा प्रश्न हा एका प्रदेशापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करताना जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे.

           

मातीपाणी आणि हवा हे पर्यावरणाचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. औद्योगिकीकरण आणि वाढत्या पायाभूत सुविधांमुळे या तिन्ही घटकांवर ताण निर्माण झाला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास देशांनी विकासासाठी पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या उद्योगांना परवानगी दिली आणि आता त्याची किंमत मोजावी लागत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी नमूद केले.

            पर्यावरणविषयक परिषदांमधील चर्चा केवळ बौद्धिक पातळीवर न राहता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजेअशी आशा व्यक्त करूनमुंबई क्लायमेट वीकमुळे विविध देशांतील तज्ज्ञांशी विचारविनिमयाची संधी मिळाल्याबद्दल श्रीमती मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपालांनी रासायनिक खतांचा अतिवापर, तसेच युरिया, डीएपी आणि

 राज्यपालांनी रासायनिक खतांचा अतिवापर, तसेच युरिया, डीएपी आणि कीटकनाशकांमुळे नायट्रस ऑक्साईडसारख्या वायूंचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम अधोरेखित केला. या रसायनांचा अंश भूजल आणि अन्नसाखळीत जाऊन गंभीर आजार होतात. रासायनिक शेतीमुळे जमीन अनुपजाऊ होत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कार्बन आणि भूजलसाठा वाढतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय प्राकृतिक कृषि मिशनच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना दिल्याचे राज्यपाल श्री.देवव्रत यांनी सांगितले.

            एका वृत्तपत्राने केलेल्या पाहणीत 105 मातांच्या दुधात कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे नमूद करून याकडे गंभीरतेने पाहण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

‘मुंबई क्लायमेट वीक’च्या तीन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून

 मुंबई क्लायमेट वीकच्या तीन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून हवामान बदलाच्या गंभीर प्रश्नावर देश-विदेशातील तज्ज्ञांनी चिंतन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले.  राज्यपाल श्री.देवव्रत म्हणाले कीभारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र आधुनिक काळात भोगवादी प्रवृत्ती वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये माणूस घरात राहिल्याने नद्या स्वच्छ झाल्याआकाश निर्मळ दिसू लागले. यावरून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात मानवी हस्तक्षेपच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होतेअसे त्यांनी नमूद केले.

पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

 पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

                                                - राज्यपाल आचार्य देवव्रत

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप

 

            मुंबई, दि. 19 : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहेशिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्‍ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. 

श्री. संदीप जठार, मुरुड यांनी रांगोळीतून श्री छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत.

 श्री. संदीप जठार, मुरुड यांनी रांगोळीतून श्री छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत.


जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने; अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे

 जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने;

अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे

महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण

मुंबईदि. ९ : जनगणना हा विकास नियोजनाचा भक्कम पाया आहे. जनगणना २०२७  डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूकपारदर्शकपणे करताना राष्ट्रीय मानकांचे पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावेअसे आवाहन महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांनी जनगणना २०२७ च्या अनुषंगाने आयोजित राज्यस्तरीय सम्मेलनात केले.

सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या या लनात महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त, मृत्युंजयकुमार नारायण व मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी  दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.  या परिषदेस अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्याससंचालक तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्यासह विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi