जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने;
अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे
- महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण
मुंबई, दि. १९ : जनगणना हा विकास नियोजनाचा भक्कम पाया आहे. जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूक, पारदर्शकपणे करताना राष्ट्रीय मानकांचे पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांनी जनगणना २०२७ च्या अनुषंगाने आयोजित राज्यस्तरीय सम्मेलनात केले.
सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या या संमेलनात महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त, मृत्युंजयकुमार नारायण व मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. या परिषदेस अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्यास, संचालक तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment