Thursday, 22 January 2026

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 

मुंबईदि. २१ : नवी दिल्ली येथे २३ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (आयआयसीडीईएमसुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन झाले असून३२ देशांतील ७१ प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपमनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा आरंभ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते शिष्टमंडळ प्रमुखांच्या औपचारिक स्वागताने होत असूनयावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित असतील.

या परिषदेत ७०हून अधिक देशांतील १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीविविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीभारतातील परदेशी मिशन्स तसेच निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि कार्यरत तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. लोकशाहीनिवडणूक व्यवस्थापनआंतरराष्ट्रीय निवडणूक मानकेतसेच निवडणूक प्रक्रियेतील नवकल्पना आणि उत्तम पद्धती यावर सखोल चर्चा होणार आहे.

परिषदेदरम्यान उद्घाटन सत्रइलेक्शन मॅनेजमेंट बॉडी (ईएमबी) लीडर्स प्लेनरीकार्यगट बैठका तसेच विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६ विषयक गटांमध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी नेतृत्व करणार असूनराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चांमध्ये ४ आयआयटी६ आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसीयांसारख्या अग्रगण्य संस्थांचा सहभाग असणार आहे.

याच वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्र परिषदेचे २०२६ साठी अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्या अनुषंगानेआयआयसीडीईएम-२०२६ मध्ये भारताची समावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही’ ही व्यापक संकल्पना केंद्रस्थानी राहणार आहे.

आयआयसीडीईएम-२०२६ परिषदेमुळे लोकशाहीच्या भवितव्यावर आणि निवडणूक प्रशासनावर जागतिक पातळीवरील उच्चस्तरीय संवादाला नवी दिशा मिळणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजीशीख इतिहासातील 'झफरनामाया महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 

अहिल्यानगरदि. २१ - नांदेड येथे 'हिंद दी चादरश्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम पर्वाच्या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाचमहाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात मोलाची भर घालणाऱ्या अहिल्यानगर शहराला लाभलेल्या शीख इतिहासाच्या एका अत्यंत महत्वपूर्ण पर्वावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते. गोविंदपुरा येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजीहे स्थान शीख इतिहासातील 'झफरनामाया निर्णायक घटनेचा थेट साक्षीदार मानले जाते.

 

इतिहासाच्या पानांवर कोरलेली ही महत्त्वपूर्ण घटना १८ व्या शतकाच्या सुरुवातीची (सन १७०५-०६) आहे. शीख धर्माचे दहावे गुरुश्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांनी स्वतःच्या वडिलांचे व पुत्रांचे मारेकरी ठरलेल्या  तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र पाठविले होतेजे इतिहासात 'झफरनामा' (विजयाचे पत्र) म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची व जोखमीची जबाबदारी गुरु गोविंदसिंगजींनी 'पंच प्याऱ्यांपैकी एक असलेल्या 'भाई दया सिंगजीयांच्यावर सोपविली होती.

 

या ऐतिहासिक घटनेचा बंध थेट अहिल्यानगर शहराशी जोडलेले आहेत. श्री गुरु गोविंदसिंगजी महाराजांनी बादशहा औरंगजेबापर्यंत झफरनामा पोहोचविण्यासाठी भाई दया सिंगजी यांना पाठविले. तीन ते चार महिने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर भाई दया सिंगजींना अहिल्यानगर येथे खुला दरबारात औरंगजेबाची भेट मिळाली व त्यांनी झफरनामा त्याच्यासमोर सादर केला. त्या काळी औरंगजेब भिंगार भागात छावणीत होता. त्या छावणीच्या बाहेरील मर्यादेत असलेल्या सध्याच्या गोविंदपुरा परिसरात (अहिल्यानगर) भाई दया सिंगजीऔरंगजेब


भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 

मुंबईदि. २१ : नवी दिल्ली येथे २३ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (आयआयसीडीईएमसुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन झाले असून३२ देशांतील ७१ प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपमनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा आरंभ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते शिष्टमंडळ प्रमुखांच्या औपचारिक स्वागताने होत असूनयावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित असतील.

या परिषदेत ७०हून अधिक देशांतील १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीविविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीभारतातील परदेशी मिशन्स तसेच निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि कार्यरत तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. लोकशाहीनिवडणूक व्यवस्थापनआंतरराष्ट्रीय निवडणूक मानकेतसेच निवडणूक प्रक्रियेतील नवकल्पना आणि उत्तम पद्धती यावर सखोल चर्चा होणार आहे.

परिषदेदरम्यान उद्घाटन सत्रइलेक्शन मॅनेजमेंट बॉडी (ईएमबी) लीडर्स प्लेनरीकार्यगट बैठका तसेच विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६ विषयक गटांमध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी नेतृत्व करणार असूनराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चांमध्ये ४ आयआयटी६ आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसीयांसारख्या अग्रगण्य संस्थांचा सहभाग असणार आहे.

याच वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्र परिषदेचे २०२६ साठी अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्या अनुषंगानेआयआयसीडीईएम-२०२६ मध्ये भारताची समावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही’ ही व्यापक संकल्पना केंद्रस्थानी राहणार आहे.

आयआयसीडीईएम-२०२६ परिषदेमुळे लोकशाहीच्या भवितव्यावर आणि निवडणूक प्रशासनावर जागतिक पातळीवरील उच्चस्तरीय संवादाला नवी दिशा मिळणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग द्या मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग द्या

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 

मुंबईदि. 21 : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावाअसे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

            बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेउपजिल्हाधिकारी अंजली भोसलेमुख्य बंदरे अधिकारी खराह आदी उपस्थित होते.

 

            रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात 25 फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावाअसे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

            रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईलअसेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

 गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

मुंबईदि. २१ : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावातसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावीया उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असूनया प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या आधुनिक टसर रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम शेतकऱ्यांना खुल्या व पारदर्शक बाजारात विक्रीची सुविधा उपलब्ध होणार असूनकोषांना योग्य व स्पर्धात्मक दर मिळणार आहे.

या माध्यमातून टसर रेशीम उत्पादनसाठवणलिलाव व विपणनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या बाजारपेठेसाठी प्रशासकीय इमारतपाणीपुरवठास्वच्छता व्यवस्थाविद्युतीकरणदिव्यांगांसाठी सुलभ सुविधाअंतर्गत रस्ते व निचरा व्यवस्था आदी सर्व आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी रेशीम संचालनालयामार्फत करण्यात येणार असूनकेंद्र सरकारच्या केंद्रीय रेशीम मंडळ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. हा उपक्रम टसर रेशीम शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्यबाजारातील विश्वास व शाश्वत उत्पन्नाचा मजबूत आधार ठरणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये भरतीक्षेत्रीय व्यवस्थापक (९९९०३१२३१२), सुरक्षा अधिकारी (७४२०००२८३१) कार्यालयीन दूरध्वनी (९४६६८१९८८७)

 माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये भरती

मुंबई,दि.२१: माजी सैनिक, वीर नारी तसेच सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी आणि अवलंबित पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीकडून सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी सेवा पद्धतीवर असून, उमेदवारांना त्यांच्या राहत्या घरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर कामाचे ठिकाण देण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.         

        कंत्राटी सेवा पद्धतीवर  सुरक्षा रक्षक भरण्यात येणार आहे. या पदासाठी दररोज ८ तास कामआठवड्यातून १ साप्ताहिक सुट्टीपीएफ ईएसआय अंतर्गत जीवन विमा सुविधा, बोनस व ग्रॅच्युइटी या सुविधा आहेत. या पदासाठी एक्स सर्व्हिसमन, आर्मी, नेव्ही व एअर फोर्स साठी ३५ ते ५८ वर्षेसीआरपीएफएसआरपीएफ, बीएसएफसीआयएसएफआयटीबीपी,  होमगार्ड  यासाठी ३५ ते ५५ वर्षे वयोमर्यादामाजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर नारी : १८ ते ४५ वर्षेमाजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर पत्नी  १८ ते ४५ वर्षेमाजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर पाल्य ईएसएम पाल्य : २१ ते ३५ वर्षे ही वयोमर्यादा आहे.

           या पदासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड,पॅन कार्डबँक पासबुक (स्वतःचे व वारसाचे)डिर्स्चाज बुकपीपीओएक्स सर्व्हिसमन आयडी (सेवानिवृत्त जवानांसाठी)मेस्को कोर्स सर्टिफिकेट (वीर नारी, सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी व पाल्यांसाठी) मेस्को सिक्युरिटीद्वारे राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्याची दिशा देणारी ठरणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

संपर्कासाठी क्रमांक:- क्षेत्रीय व्यवस्थापक (९९९०३१२३१२)सुरक्षा अधिकारी (७४२०००२८३१) कार्यालयीन दूरध्वनी (९४६६८१९८८७)

0000

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

 राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

 

नवी दिल्ली,२१: प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६ चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धे'च्या विभागीय स्तरावरील फेऱ्यांची यशस्वी सांगता झाली असून, महाराष्ट्रातील दोन शाळांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम विभागातून  महाराष्ट्राच्या संजीवनी सैनिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कोपरगाव (अहिल्यानगर) या शाळेच्या मुलांच्या ब्रास बँड पथकाने आणि डॉन बॉस्को हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, विक्रोळी (मुंबई) या शाळेच्या मुलींच्या ब्रास बँड पथकाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

 

 संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवन येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात आला आहे.

 

यंदाच्या स्पर्धेत राज्यस्तरावर देशभरातील ७६३ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी विभागीय स्तरावर ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ८० पथकांनी, ज्यामध्ये २,२१७ विद्यार्थ्यांचा समावेश होता, आपली कला सादर केली. कडक निकषांनंतर आता अंतिम फेरीसाठी देशभरातून एकूण १६ उत्कृष्ट पथकांची निवड करण्यात आली आहे.

 

अंतिम फेरीचे मूल्यांकन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली आहे. यामध्ये भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

 

प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५१,००० रुपये, ३१,००० रुपये आणि २१,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. तसेच, उर्वरित सहभागी संघांना ११,००० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

 

0000

Featured post

Lakshvedhi