Monday, 19 January 2026

वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय

सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 

मुंबईदि. १८: सहाव्या वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे आलेल्या विविध ४० देशातील प्रतिनीधींना सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या प्रतिनीधींना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते.

विविध ४० देशांतून आलेल्या फेलोंचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्री. गवांदे यांनी स्वागत करीत भारताच्या विविधांगी संस्कृतीचे महत्व विषद केले. त्यांनी मुंबईचे जागतिक आणि भारतातील महत्व अधोरेखित करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माहिती दिली.

यावेळी लावणीपंढरपूर वारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतनाट्य सादर करण्यात आले.


वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय

सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 

मुंबईदि. १८: सहाव्या वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे आलेल्या विविध ४० देशातील प्रतिनीधींना सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या प्रतिनीधींना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते.

विविध ४० देशांतून आलेल्या फेलोंचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्री. गवांदे यांनी स्वागत करीत भारताच्या विविधांगी संस्कृतीचे महत्व विषद केले. त्यांनी मुंबईचे जागतिक आणि भारतातील महत्व अधोरेखित करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माहिती दिली.

यावेळी लावणीपंढरपूर वारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतनाट्य सादर करण्यात आले.

0000

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी

मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

 

मुंबई दि. १८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

        

ही एकांकिका स्पर्धा यावर्षीपासून फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. कोकण विभागातील स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी२०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिरमाटुंगा येथे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर ही स्पर्धा पुणेअमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांत प्राथमिक फेरीच्या स्वरुपात घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या नाट्यसंघांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

 

प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्या संघांमधून प्रत्येक विभागातून ५ उत्कृष्ट संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असूनअशा प्रकारे एकूण २० संघ अंतिम टप्प्यात पोहोचणार आहेत. 

       

विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण प्राथमिक फेरी निशुल्क ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाट्यसंघांनी व रसिक प्रेक्षकांनी या एकांकिका स्पर्धेतील नाटकांचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

     

मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणेएकांकिका चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणेहाच या भव्य स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

 इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना


‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी WEF 2026 महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.

दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

दरवर्षी बदललेली मुंबई...प्रत्येक शहरात विकास...!

 दरवर्षी बदललेली मुंबई...प्रत्येक शहरात विकास...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पायाभूत सुविधांची निर्मिती झालीत्यामध्ये सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीत महाराष्ट्र पुढे आहे असा उल्लेख करून ते म्हणालेमुंबईचा कायापालट करतो आहोत. पुढच्या काळात अजून काही महत्वाकांक्षी बदल होणार आहेत. दरवर्षी आपण मराठी मुंबईत परत यालत्या प्रत्येक वर्षी मुंबई बदलेली दिसेल. २०३० मध्ये जगातल्या विकसित राष्ट्राच्या राजधानीच्या शहराहून उत्तम मुंबई पुढच्या पाच वर्षात तयार झालेली दिसेल. मुंबईच नव्हेतर हे परिवर्तन पुणेछत्रपती संभाजीनगरनागपूरनाशिक आणि कोल्हापूरातही दिसेल. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विकासाचा वेग पकडला आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाहीया ध्येयवाक्य प्रमाणेच महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे जाणार आहे. यात विदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांचेही महत्वाचे योगदान राहणार आहे.

स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही भेट घेत मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या कार्यक्रमात 'स्वागत देवाभाऊअसे फलक झळकले. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.

सांस्कृतिक समृद्धी म्हणूनच महाराष्ट्र समृद्ध.

 सांस्कृतिक समृद्धी म्हणूनच महाराष्ट्र समृद्ध...!

मराठी भाषा अभिजात होती. पण तिला राज्यमान्यता मिळणे आवश्यक होते. ही राज्यमान्यता मिळवून देण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे उल्लेख करूनमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआपण विदेशातील मराठी बांधव मराठी भाषेच्या संवर्धनाकरितामराठी भाषेच्या संपन्न-समृद्धीकरिता प्रय़त्न करत आहातहे कौतुकास्पद आहे. भारताबाहेर आपण युरोपमध्ये मराठी शाळा चालवता. मुलांना मराठी भाषा शिकवता. भाषा या माध्यमामुळे आपण आपली संस्कृतीसंस्कारउत्सवआपले साहित्यकला यांच्याशी जोडलो जातो. भारतात महाराष्ट्र भौतिकदृष्ट्या समृद्धसंपन्न तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समजले जाते. महाराष्ट्राने केवळ भौतिक समृद्धी मिळविलेली नाहीतर तर सांस्कृतिक समृद्धी देखील मिळवलेली आहे. आपण सांस्कृतिक समृद्धी टिकवली म्हणूनच भौतिक दृष्ट्या समृद्ध ठरलो आहोत. यातूनच महाराष्ट्र हे येत्या तीन वर्षात भारतातील ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य ठरेलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विदेशी थेट गुंतवणूकस्टार्ट अपमध्येनिर्यातमॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रथम क्रमांकांचे राज्य आहे. देशातील साठ टक्के डाटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. एआय आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांतही महाराष्ट्र सर्वात पुढे असल्याचा उल्लेख केला.

 

महाएनआरआय कनेक्ट

 महाएनआरआय कनेक्ट..!

जगभरातील मराठी-भारतीय मंडळी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. त्यातील अनेक गोष्टी या अतिशय अर्थपूर्ण आणि अभिनवपरिवर्तनशील अशा आहेत. या सगळ्या गोष्टींचे अदान-प्रदान झाले पाहिजे. यासाठी बृहन्महाराष्ट्राशी म्हणजेच बृहद महाराष्ट्राशी संबंधित मराठी जन आहेतत्यांचा कनेट जगातील अन्य मराठी बांधवाशी असला पाहिजे. त्यासाठी हे व्यासपीठ- प्लॅटफॉर्म महत्वपूर्ण ठरेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला स्वदेशस्वधर्म आणि स्वभाषा यांचा वसा-वारसा दिला आहे. या तीनही गोष्टींसाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला एकमेकांशी जोडेल. तो परस्परांतील संपर्क- समन्वय वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. यातून आपल्या सर्वांसाठी समृध्दीचा नवीन मार्ग खुला होईल.

 

Featured post

Lakshvedhi