Saturday, 17 January 2026

पु.ल.देशपांडे अकादमी येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

 पु.ल.देशपांडे अकादमी येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

 

मुंबईदि. १७ : राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गतपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबईसांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने दि. २२, २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अकादमी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या व्याख्यानमालेंतर्गत दि. 22 जानेवारी रोजी ज्येष्ठ लेखकविश्लेषक व अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ‘ए आय तंत्रज्ञान व कलाविश्व’दि. २३ जानेवारी रोजी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या युनेस्को नामांकनाचा रोमांचक प्रवास’ आणि दि. २४ जानेवारी रोजी मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे अभिजात ‘मराठी: इतिहास वर्तमान व भविष्यया विषयांवर व्याख्यान होणार आहे.

 

ही व्याख्यानमाला विनामूल्य असूनसर्वांसाठी प्रवेश खुला आहे. या व्याख्यानांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

००००


मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच इतर संबंधित

 संपूर्ण निवडणूक कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा व अधिकारी-कर्मचारीकामगार अहोरात्र कार्यरत होते. यासोबतच मुंबई पोलीस दलातील सुमारे ३० हजार अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष बंदोबस्तात कार्यरत होते. तसेच केंद्र शासनराज्य शासनविविध प्राधिकरणेबँका आणि निमशासकीय संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी यांनीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि माननीय राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व कर्मचारीकामगार यांनी आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली.

मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले निवडणूक अधिकारीकर्मचारीपोलीस यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध व समर्पित कामगिरीबाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांमधील समन्वयामुळे मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकलीअसे त्यांनी नमूद केले.

लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या जबाबदारीमुळेच निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व प्रभावी ठरली आहे. भविष्यातही प्रशासकीय कामकाजात सर्वच घटकांचे अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी नमूद केले आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे संपन्न महानगरपालिका प्रशासनाने मानले मुंबईकरांचे आभार

  

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे संपन्न

महानगरपालिका प्रशासनाने मानले मुंबईकरांचे आभार

 

मुंबईदि.१७ : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत पार पडलेल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व घटकांचे सहकार्य लाभले. मुंबईकर मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावला. एकूणच संपूर्ण निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेतपारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबईकर नागरिकसर्व राजकीय पक्षउमेदवारकार्यकर्तेप्रसार माध्यमसर्व यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केले.

या सहकार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच विशेष कार्य अधिकारी (निवडणूक)  विजय बालमवारसहआयुक्त (करनिर्धारण व संकलन)  विश्वास शंकरवारअपर जिल्हाधिकारी (कोकण विभाग) तथा महानगरपालिका निवडणूक समन्वयक सहायक फरोग मुकादमसहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या २२७ नगरसेवक निवडीसाठी गुरुवारदिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण मिळून १० हजार २३१ मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधामतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधादिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्थापिण्याचे पाणीस्वच्छता तसेच रॅम्प व मार्गदर्शक सूचना यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. एकूण ६४ हजार ३७५ मनुष्यबळाच्या प्रभावी व्यवस्थापनासह ४ हजार ५०० स्‍वयंसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

या निवडणुकीत मुंबई महानगरातील १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदारांपैकी सुमारे ५४ लाख ७६ हजार ०४३ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. त्‍यात पुरूष मतदारांची संख्‍या २९ लाख २३ हजार ४३३ इतकीमहिला मतदारांची संख्‍या २५ लाख ५२ हजार ३५९ तर इतर मतदारांची संख्‍या २५१ इतकी आहे. एकूण ५२.९४ टक्के मतदानाची नोंद झाली.

विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

 विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८४ हजार ३१८ मुले आणि ८८ हजार २०२ मुलींचा समावेश असून इतर ०२ विद्यार्थी समाविष्ट आहेत. यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी १ लाख ४९ हजार ९८२ विद्यार्थ्यांचा समावेश असून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २२ हजार ५४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ७४ हजार ७२९ मुले आणि ७५ हजार २५२ मुलींचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ५८९ मुले आणि १२ हजार ९५० मुलींचा समावेश असून इतर १ विद्यार्थ्याचा समावेश आहे.

कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया

 कुतूहलसर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया -   डॉ. अजय कुमार सूद

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले कीभारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असूनकुतूहलसर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.

शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापनसंकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षणरोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.

डॉ. सूद यांनी एस-लाइफ फ्रेमवर्कची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नातेप्रयोगशाळांचा पुनरुज्जीवनसंशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरणविज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असूनदेशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेचकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0 च्या माध्यमातून आरोग्यशेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरसरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालतआजचा युवक धैर्यसर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेलअशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन

 विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. यामुळे विज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश होऊन सर्वांगीण विद्यार्थी तयार होतील.


शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण धोरणामुळे आत्मज्ञान, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडेल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल

 राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

·         मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ

·         विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

मुंबईदि. १७ :- मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडेलोकमान्य टिळकमहात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्षण घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षमसृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना नवोपक्रमसंशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळून देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रीय सहभाग राहीलअसे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Featured post

Lakshvedhi