Saturday, 17 January 2026

कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया

 कुतूहलसर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया -   डॉ. अजय कुमार सूद

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले कीभारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असूनकुतूहलसर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.

शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापनसंकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षणरोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.

डॉ. सूद यांनी एस-लाइफ फ्रेमवर्कची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नातेप्रयोगशाळांचा पुनरुज्जीवनसंशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरणविज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असूनदेशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेचकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0 च्या माध्यमातून आरोग्यशेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरसरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालतआजचा युवक धैर्यसर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेलअशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi