कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया - डॉ. अजय कुमार सूद
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले की, भारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असून, कुतूहल, सर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.
शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षण, रोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.
डॉ. सूद यांनी ‘एस-लाइफ फ्रेमवर्क’ची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नाते, प्रयोगशाळांचा पुनरुज्जीवन, संशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरण, विज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असून, देशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0” च्या माध्यमातून आरोग्य, शेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालत, आजचा युवक धैर्य, सर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेल, अशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.
No comments:
Post a Comment