Wednesday, 3 December 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या

स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव

 

मुंबई,दि.३ : पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि विकास योजनांची जलद अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागामार्फत राज्यात सन २०२५-२६ पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या कामगिरीच्या आधारे तालुकाजिल्हामहसूल विभाग व राज्य स्तरावर मूल्यमापन करून पुरस्कार देण्यात येणार आहेत. या योजनेचे स्वरुप स्पर्धात्मक असल्यामुळे या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या  ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासननिर्णयान्वये मान्यता  दिली आहे.

       अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि प्रचारात्मक खर्चासाठी जिल्हा परिषदांना स्वनिधी (सेस फंड) अपुरा ठरत असल्यानेजिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

       शासन निर्णयानुसारसंबंधित जिल्हा परिषदांनी हा निधी अभियानातील घटकांसाठी प्राप्त प्रस्तावांनुसार आणि शासनाने दिलेल्या वेळापत्रकातच खर्च करणे अनिवार्य राहणार आहे. अधिक पारदर्शकता आणि प्रभावी नियोजनासाठी क्षमता बांधणीप्रशिक्षणकार्यशाळायशोगाथा फिल्ममेळावे आणि तांत्रिक सहाय्य इत्यादींसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.

       हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५११०४१८१५४९६६२० असा आहे. 

राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार

 राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार

·         विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय

मुंबईदि. ३ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही  दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेउच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारविधानसभा सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकरजितेंद्र आव्हाडभास्कर जाधवसुनील प्रभू, अमीन पटेल विधानपरिषद सदस्य अनिल परबप्रसाद लाडप्रवीण दरेकरविक्रम काळेसतेज पाटीलविधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

00000

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त

दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

 महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत

 

            मुंबईदि. 3: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमांतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व योगदान या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत 68 आणि 9 डिसेंबर 2025 या रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तर जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार9 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्यायस्वातंत्र्यसमानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने कार्यरत आहे. समाजातील वंचित घटकांना अंधश्रद्धाजातीय-पंथीय भेदभावसांप्रदायिक द्वेष व असमानतेतून मुक्त करत वैज्ञानिक दृष्टिकोनसामाजिक ऐक्य आणि समतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी शासनामार्फत विविध धोरणात्मक उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर, ‘महापरिनिर्वाण दिन’ निमित्तभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी कार्यविचारसंपदा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान या विषयावर महासंचालक श्री. वारे यांनी दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

 

 

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

 

 

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

 

00000

ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पइंधन बचत, प्रदूषणात घट आणि कार्यालयीन प्रवासात वेळेची मोठी बचत होणार

ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणारा


                  या प्रकल्पामुळे इंधन बचतप्रदूषणात घट आणि कार्यालयीन प्रवासात वेळेची मोठी बचत होणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई–पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्यांनाही या बोगद्याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील भूमिगत वाहतूक व्यवस्थेचा हा मोठा प्रयोग असून फ्लायओव्हरकोस्टल बोगदाआणि आता भूमिगत बोगदा या सर्वांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचे खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पाची माहिती

Ø  मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठीमुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.

Ø  प्रकल्पाचा खर्चः रु ८०५६ कोटी

Ø  पूर्णत्वाचा कालावधीः ५४ महिने

प्रकल्पाचे मुख्य फायदे

 

Ø  मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.

Ø  प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.

Ø  इंधनाची बचत होईल.

Ø  तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

प्रकल्प तपशील

Ø  हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्यपश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) च्या ५० मी. खालून जातो.

Ø  प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किमी ज्यामध्ये जवळपास ७ किमी भुयारी मार्ग .

Ø  प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते१ पदरी आपत्कालीन रस्ता . दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग ८० किमी/तास .

Ø  दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.

Ø  बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणापुरेश प्रमाणात प्रकाश व्यवस्थासुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएसइत्यादी बाबींचे प्रयोजन आहे.

Ø  प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होतेशहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते.

Ø  सदर प्रकल्प हा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो.

बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान

 

Ø  या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन  असूनही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.

Ø  हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)

 

Ø  प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (ओईएमयांचा देखरेखीत करण्यात आले आहे.

Ø  कटर हेड व्यासः १२.१९ मीटर

Ø  लांबी: ८२ मीटर

Ø  वजनः अंदाजे २४०० मेट्रिक टन.

 

ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणारा

 ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणार

                                                -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अटल सेतू मार्गे ठाणेनवी मुंबईवरून येणारी मोठी वाहतूक मुक्त मार्गाच्या उतरणीजवळ कोडीत अडकत असून मागे उद्घाटन झालेल्या अटल सेतूची वाहतूक ही आता इथे येत आहे. या नव्या बोगद्यामुळे ही कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे, मरीन ड्राइव्हचर्चगेटकोस्टल रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हा बोगदा पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा ठरणार असून लाखो नागरिकांचा प्रवास वेळ वाचवेलअसे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे मेट्रो मेट्रो मेट्रो  सारख्या प्रकल्पांनी शहराला दिलासा दिलातसाच हा भूमिगत बोगदाही वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा बोगदा मेट्रो  च्या खाली जात असल्याने हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम नमुना असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह

शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ

 


या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असूनते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा  प्रयत्न आहे. एल अ‍ॅण्ड टी या नामांकित कंपनीकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.वरळी–शिवडी सी-लिंक पुढील वर्षी खुला झाल्यानंतरतसेच कोस्टल रोड जोडणी झाल्यावरपश्चिम उपनगरातील लोकांनाही नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे हजारो लोकांचे हजारो तास वाचवणारा हा प्रकल्प असूनमुंबईच्या वाहतुकीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहेअसे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीपूर्वी या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा विचार होतापरंतु जागेअभावी आणि प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य नाही. हा परिसर मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही अधिक दाटीचा असल्याने बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालूनशंभर वर्षे जुन्या हेरिटेज इमारतीतसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन्सखालून जाणार आहे. विशेष म्हणजेहा बोगदा मेट्रो-3 च्या 50 मीटर खाली खोदला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थाने इंजिनिअरिंग मार्व्हल ठरणार असल्याचे  मुख्यमंत्री  फडणवीस यांनी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi