Saturday, 14 September 2024

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

         नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

           महिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिला स्टार्टअप्सना निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनासुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणेदेशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे.या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असूनसुमारे एक हजार स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

मंत्री  श्री.लोढा म्हणाले, "अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी आपल्या भारत देशाला घडवण्यासाठी आपले योगदान दिले. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो आहोत. संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधान निर्मितीचा इतिहासत्याचे महत्वयेणा-या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहेभारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.  उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात्याबद्दल त्यांचे आभार मानतो!"

नायब' हस्तकला प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन

 नायबहस्तकला प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन


- सी. पी. राधाकृष्णन

 

            मुंबईदि. 13 : 'नायबया हस्तकला प्रदर्शनाचे फिकी फ्लोने केलेले उत्कृष्ट आयोजनभारतातील हस्तकला आपल्या देशाच्या समृध्द वैविध्यपूर्ण वारशाची प्रगल्भ पावती आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

            हॉटेल ताज येथे नायब या हस्तकला प्रदर्शनाचे फिकी फ्लो आणि हॉटेल ताज यांच्या समन्वयातून आयोजन केले होते. यावेळी नायब प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे माजी संचालक डॉ डी. आर. कार्तिकेयनफिकी फ्लोच्या अध्यक्ष डॉ.पायल कनोडियाक्राफ्ट ॲण्ड मेस्ट्रोचे संचालक अजय सिंगआकांक्षा दिक्षित यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले कीआपल्या पारंपरिक कला या आपली अमर्याद सर्जनशीलता आणि कौशल्याचा पुरावा आहे. आजच्या प्रदर्शनातून हेच साध्य होत आहे. आदिवासी कला ते भारताच्या कानाकोप-यातील कलाकार यामध्ये सहभागी झाले असून पदमश्रीपद्मविभूषण ही सर्वोच्च पारितोषिक प्राप्त कलाकार यामध्ये सहभागी आहेत. 

            राज्यपाल म्हणाले कीआपल्या सर्वोत्कृष्ट वारसा, कला आणि हस्तकला समोर आणण्यासाठी  आयोजकांचे समर्पण खूप महत्वाचे आहे. आपल्या देशातील सुंदर ठिकाणे, आपली लोकसंस्कृतीआदिवासी कला नायब या प्रदर्शनीतून  दिसत आहेत. या केवळ कलाकृती नाहीत तर  आपला समृध्द वारसा आहे, जे आपल्याला आपल्या भूतकाळाशी जोडतात आणि आपल्या भविष्यासाठी प्रेरणा देतात. ही कला जपणारे आपले कलाकार हे आपली संपत्ती आहे. या कलांचे अस्तित्व आणि समृद्धी  पुढच्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्थान मिळवून दिले. त्याचप्रमाणे या कला देखील जागतिकस्तरावर पोहोचविण्यासाठीएक विकसित भारत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आपल्या कला भावी पिढीला माहिती व्हाव्यात आणि  हा वारसा  सर्वदूर पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

            यावेळी  नायब या प्रदर्शनीत राष्ट्रीय स्तरावरील गोंदबीलकर्नाटक वुडतरकाशीकलमकारी पेंटीगफड पेंटींगमिनाकारी पेंटींगवुड क्रावींग याचे विविध 80 कला लावण्यात आल्या होत्या त्याची राज्यपाल यांनी पाहणी केली.

                                                            *

डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार 12 हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती

 डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार

12 हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती

 

मुंबईदि. 13 : मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी 12 हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असूनत्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात यासंदर्भातील आश्वासन दिले होतेत्याची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार असूननमन बिल्डर ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत. यातून 12 हजार घरांची निर्मिती होणार असूनती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकी 500 चौरस फूट आकाराचे घर केवळ 25 लाखात यामुळे दिले जाणार आहे. डब्बेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न हे येत्या 3 वर्षात पूर्ण होणार आहे.

आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत आणि म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहे. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईलअसेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहमुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाहप्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठीआमदार श्रीकांत भारतीयडबेवाला संघटनेचे उल्हास मुकेचर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते.

००००


 

सौर कृषिपंपातून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

 सौर कृषिपंपातून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

                                                        - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 13 : कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेमुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशनही त्यांनी यावेळी केले.

            या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमहानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगनमहापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमारउपमुख्यमंत्र्याचे सचिव श्रीकर परदेशी आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीसौर कृषिपंपाच्या पॅनेल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल व त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळविता येईलअशी योजना लागू करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी हा वीजबिल भरणाऱ्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळविणारा होईल. राज्यात 2014 पूर्वी शेतकऱ्यांना पेड पेंडिंगची समस्या तीव्रतेने जाणवत होती. त्यानंतर शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला. आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90 टक्के सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहेत. सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होत आहे. सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीजबिल येणार नाही. साडेसात एचपी पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीजबिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘कुसुम बी’ योजनेच्या आधारे लागू केली असल्याने आपण प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले.

            मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 12 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे करार झाले आहेत. आगामी दोन वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी शंभर टक्के सौर ऊर्जा मिळेल. शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील. गेल्या अडीच वर्षातील कार्यकाळ हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे. या काळात तीनही वीज कंपन्यांनी मोलाची कामगिरी केली आहेअसे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

            यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी काही लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लाभार्थी शेतकरी या योजनेबद्दल समाधानी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल जागतिक कृषी परिषदेच्या 20 देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

 पर्यावरण रक्षणशाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

जागतिक कृषी परिषदेच्या 20 देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

मुंबईदि. 13 : पर्यावरण रक्षणशाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एन सी पी ए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत दि. 18 रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे.

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रातील प्रयत्न

संयुक्त राष्ट्र संघटनेने आता तापमान वाढीचे युग संपून होरपळीचे युग सुरू झाल्याने त्वरित कृतीची गरज व्यक्त केली आहे. त्यास प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील    पहिले राज्य ठरले आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना  केली असून त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमून संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. त्याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5% बायोमास वापरायचे देखील निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. पवार यांनी एक लाख वीस हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या याच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला आहे. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व जागतिक कृषी परिषदेने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमअन्न सुरक्षा विषयी जागतिक व्यासपीठ

जागतिक कृषी परिषद ('वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम') हे अन्न सुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठी अनोखे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी मंचचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर  होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक  वनस्पती विज्ञानकृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादनव्यापारतंत्रज्ञानव्यवसायधोरण आणि आर्थिक परिस्थितीपोषणअन्न प्रक्रियापाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा  समावेश करते. यासाठी  निवड देखील जुरी योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करूनते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते

येत्या बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन लोदगाजिल्हा लातूर यांनी केले असून 18 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा महत्त्वाचा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत विविध चर्चासत्रांनी पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात मुख्य सत्काराचा कार्यक्रम होईल.

0000

शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची आरती.. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इच्छापूर्ती गणेश दर्शनासाठी आलेली मुले नव्या कोऱ्या बसमधून रवाना


 शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची आरती..

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इच्छापूर्ती

गणेश दर्शनासाठी आलेली मुले नव्या कोऱ्या बसमधून रवाना

 

मुंबईदि. 13 :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  मुलांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला दुमदुमून गेला. आपल्या मनातील दुःख, वेदना दूर सारत त्यांनी मोठ्या आनंदाने गणरायाची आरती केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारवड ठरलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील मुलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

या मुलांनी शाळेला ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागते, अशी अडचण सांगितली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मुलांसाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यावर तातडीने अंमलबजावणी करत सायंकाळ पर्यंत नवी कोरी बस वर्षा येथे आणून या आश्रमशाळेचे महंत श्री शिवस्वरुपानंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

दरम्यानदुपारी ही मुले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत वर्षा निवासस्थानी आली होती. या सर्वांनी वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापित गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात त्यांनी श्री गणरायाची आरती केली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही आरती चांगलीच रंगली. आरती सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आगमन झाले आणि त्यांच्या सोबत मुलांनी आरती केली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदेमुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदेमाजी खासदार हेमंत पाटीलत्यांच्या पत्नी श्रीमती राजश्री पाटील आदी उपस्थित होते.

या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने या मुलांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते. यात ही मुले अंगात शेतकरी सदरेडोक्यावर टोपी घालून मोठ्या शिस्तीने टेबल खुर्चीवर येऊन बसली. त्यांच्यासाठी आज पंचपक्वांनांचा थाट होता. या भिरभिरत्या नजरेच्या मुलांनी जेवायला सुरूवात केली, पण ती पदार्थ पुन्हा मागून घेणे किंवा समोर दिसत असलेले पदार्थ घ्यायला लाजत होती. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही अडचण ओळखली आणि ते सरसावले. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतःच एकेक पदार्थ घेऊन मायेने त्यांना आग्रह करून वाढू लागले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. आधारतीर्थ आश्रमाला जाणवणाऱ्या काही अडचणी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. तसेच त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देशही दिले.

सायंकाळी वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात नवीन बस आणण्यात आली. मंत्रोच्चारात तिचे पूजन करून मुख्यमंत्र्यांनी ही बस आश्रमाला सोपवली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुपारी ऐकून घेतलेली अडचण सायंकाळपर्यंत सोडवल्याचे पाहून ही मुले भारावून गेली. त्यांनी टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या सगळ्या मुलांनी मुख्यमंत्र्यांचे आदरातिथ्य स्वीकारत आणि मनात वर्षा बंगल्याच्या गोड आठवणी ठेवून नव्या कोऱ्या बस मध्ये बसून या भारावल्या नजरेने वर्षाचा निरोप घेतला.

Featured post

Lakshvedhi