सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 10 January 2023
जय कुणबी
जय कुणबी, आभार! आभार!! आभार!!!
न भूतो न भविष्यते असे कुणबी जोडो अभियान महाड व पोलादपूर तालुका कुणबी बांधवांनी दि.08/01/2023 रोजी प्रत्यक्षात घडवून आणले, म्हणून समस्त कुणबी बांधवांचे अभिनंदन आणि जाहीर आभार 🙏🙏 ,
👉 सदर अभियान कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, यांच्या संकल्पनेतून घडून आले.
ते प्रत्येक्षात साकार, शाखा महाड पोलादपूर आणि कुणबी समजोन्नती मंडळ यांचा सहकार्याने झाले.
👉या अभियानामुळे सक्रिय कुणबी कार्यकर्ते, महिला, पूरुष व युवा यांच्या मनात समाजपरिवर्तनाची नवीन चेतना निर्माण झाली आहे आणि नव्याने समाज उद्धार आणि जागृत करण्याचे बळ उत्पन्न झाले आहे.
🎯कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
संघ अध्यक्ष-मा.भूषण बरे ,
उपाध्यक्ष -बबन उंडरे, सदानंद काष्टे,
सहसचिव -गणेश मौले,अशोक करंजे, भास्कर चव्हाण, हरिश्चन्द्र पाटील,
संघ -प्रतिनिधी-जगन्नाथ कांदळेकर, सत्यवान यादव, सौं.मृणाल मंगेश हुमणे
🎯कुणबी राजकीय संघटन समिती,
अध्यक्ष-अशोकजी वलम, कार्याध्यक्ष -कृष्णा कोबनाक, सचिव -नंदकुमार मोहिते,
🎯महाड पोलादपूर शाखा -
अध्यक्ष-नंत गवळकर, उपाध्यक्ष -विलास शिंदे,
सचिव - दीपक महाडिक, सहसचिव -एड. मंगेश हुमणे, शेखर कांदळेकर, राजेंद्र दवंडे, खाजिनदार -विजय गोडांबे , हिशोब तपसनीस -नितीन पाष्टे,
महिला मंडळ अध्यक्षा - जोती महाडिक, उपाध्यक्ष -दीपिका मौले, सचिव -विनया गोडांबे, श्रुती निंबारे,भारती पिचूर्ले,
शंकूतला आरव,
🎯कुणबी युवा -माधवजी कंबळे, सचिव -संतोष कांबळे , खजिनदार -विजय भोसतेकर, सचिन रामाने,
🎯कुणबी समोजान्नती मंडळ
अध्यक्ष -प्रदीप लोखंडे, उपाध्यक्ष -किरीट पेंढारी, सहदेव धाडवे,
सचिव -विलास राक्षे, सहाचिव -शरद गोठलं, खजिनदार -दीपक गजमल,
🎯गट अध्यक्ष
दिलीप गोठलं -कारंजाडी, पांडुरंग भेकरे -दादली , संतोष घुलगुले -रवठळ, राजेंद्र भुवड -वोवले, सुनील भानत -विन्हेरे, सुदेश बाईत -महाड, धोंडीराम वाडकर - पोलादपूर, सुरेश शिगवण -नाते, अशोक आंबेकर -दसगाव
उपस्थित मान्यवर - नथुराम धामणे, सदानंद मांडवकर,गजानन काप, रमेश खिडबीडे , नामदेव लाल, सुभाष लाले, मृणालिनी फिलसे, जतीन गोरे, अनंत शिंदे, विक्रम मालप, रमेश नवले, संदेश गोठलं, आत्माराम दवंडे संजय रेशीम, गणेश खांबे, प्रफुल धोंडेगे, गणपत मालप, अश्विनी घरटकर, विजय पवार ,रामदास कदम, सूर्यकांत शिगवण, परशुराम गोठलं, बबन मोरे, काशीराम भुवड, उमेश उसगावकर, शांताराम पेंढारी, बाळा चांदी वडे, अशोक खांबे, गजानन वाडकर, प्रकाश देवळे, नथुराम पवार, गणपत पापले, अमृत मांडवकर, बाळाराम चव्हाण, वर्षा कालप, रेश्मा बैकर, मंगेश कालप,नामदेव घाणेकर, बबन जाबाडे, अरविंद घरटकर, एस. मोरे, मंगेश वनगुले,
महाड पोलादपूर युवा-
अध्यक्ष -समीर रेवाले, सचिव -प्रदीप घाणेकर, संतोष जउल, खजिनदार - मितेश नवले, adv विशाल गोलंबडे, योगेश मालप, adv राजेश देवाले, मिलिंद चिबडे, सचिन देवळे, नैनेश बैकर, गजानन कदम, संदीप माने, इतेश खोपटकर, रवी कोबणाक, परेश बटावले, बबन सकपाळ, सचिन धाडवे, संतोष धारसे, गणेश खामकर, विजय भडवळकर, मदन आरव,
फोटोग्राफर -यतीन लाले
पत्रकार -नितेश लोखंडे
पुनच्छ सगळ्यांचे आभार!
चुकून कुणाचे नाव लिहायचे राहिले असेल तर त्याचें पण आभार.
धन्यवाद!
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा महाड पोलदपूर
कुणबी समाजोन्नती मंडळ, महाड पोलदपूर
टिप : काही सूचना असतील तर 7738442242, या नंबर वर कळवावे
*🌹कडी*🌹
♦️ *विचारपुष्प*♦️
*🌹कडी*🌹
घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोंड्याच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला..... मै हूँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्र घरात एकटे असू... आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.
मनाच्याही दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.
मन जर कायम असं सताड उघडं असेल तर.... कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर... मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात.... जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग..... अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.
बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चात्ताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला होती हे सहज विसरुन जातो.
नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत... घरात... समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.
कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं... दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.
आगरकर आणि टिळक यांनी एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण.... काय उपयोग. मित्र कायमचा गेला.
*आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल*.
*फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती आहे*
*वाचण्यात आलेला सुंदर लेख*
❤❤❤❤❤
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
उलथले ka?
नारायणराव पत्त्याच्या जुगारात पाच लाख रुपये हरले.. त्या धक्क्याने हार्ट अ टॅक येऊन त्यांचा जागेवरच मृ त्यू झाला… त्यांच्या मित्रांना धडकी भरली. “वहिनींना सांगायचं कसं ?”.
अखेर लक्ष्मणराव म्हणाले “मी सांगतो, द्या इकडे फोन!”. लक्ष्मणरावांनी वहिनींना फोन लावला, “हां वहिनी, मी लक्ष्मण बोलतोय!”
“काय म्हणताय भाऊ ?” लक्ष्मीबाई म्हणाल्या. ” काही नाही, नारायणराव पत्त्यात दोन लाख रुपये जिंकलेत!” “अय्या, खरंच काय.. येऊ द्या घरी, दृष्टच काढते बाई त्यांची!”.
” नाही वहिनी, नंतर काय झालं, ते पाच लाख रूपये हरलेही !”. “काय, पाच लाख घालविले ?” लक्ष्मीबाई कडाडल्या! “त्यापेक्षा उलथून का गेले नाहीत !”.
“तेच झालंय सांगायला फोन केला होता, लक्ष्मणराव उलथले!!!😂
युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर 'रामबाण' उपाय शोधावे'
युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर 'रामबाण' उपाय शोधावे'
-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. १० : पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अश्या औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर आयुर्वेदातून 'रामबाण' उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
राजभवन येथे 'आयुर्वेद शिरोमणी' सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तसेच प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा, अध्यक्ष, नितिमत्ता व नोंदणी समिती, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते. उभय नामवंत आयुर्वेदाचार्यांना आयुर्वेदाच्या उल्लेखनीय सेवेसाठी वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आले.
आज आधुनिक चिकित्सा पद्धतीला पर्याय नाही. परंतु अनेक ॲलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट देखील असतात. या दृष्टीने भारतातील आयुर्वेदिक ज्ञानाचा वारसा अधिक समृद्ध कसा करता येईल व आयुर्वेदाच्या माध्यमातून जगाला निरामय जीवन जगण्याचा मार्ग कसा दाखवता येईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
आज राजस्थान, उत्तराखंड, पंजाब तसेच गुजरात येथे स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात देखील ८० आयुर्वेद महाविद्यालयाने कार्यरत आहेत. राज्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांच्या विकास व नियंत्रणासाठी राज्याने एक स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ तयार करावे, अशी सूचना आयुर्वेदाचार्य वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी यावेळी केली.
राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवन येथे देखील राज्यपालांनी एक आयुर्वेद क्लीनिक सुरु करावे, अशी सूचना त्रिगुणा यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाला वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनचे विश्वस्त वैद्य महेंद्र चतुर्वेदी, महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे संचालक डॉ राजेश्वर रेड्डी, डॉ गोविंद रेड्डी, अनेक वरिष्ठ आयुर्वेद चिकित्सक, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.
००००
Maharashtra Governor presents 'Ayurved Shiromani'
Awards to Vaidya Devendra Triguna,Vaidya Rakesh Sharma
Mumbai 10: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Ayurved Shiromani' Samman' to Padma Bhushan Vaidya Devendra Triguna, President, Rashtriya Ayurveda Vidyapeeth, New Delhi and Prof Vaidya Rakesh Sharma, President, Ethics & Registration Committee, National Commission for Indian Systems of Medicines, New Delhi at Raj Bhavan Mumbai on Mon (9 Jan).
The awards instituted by the Vaidya Sureshchandra Chaturvedi Health Foundation were presented to the two Ayurvedacharyas in recognition of their exemplary services in the field of Ayurveda.
Speaking on the occasion, Governor Koshyari called upon young Ayurveda Vaidyas to find out sureshot medicines for various ailments through modern research. Vaidya Devendra Triguna urged the Governor to create a separate Ayurveda University in Maharashtra on the lines of similar Universities in Rajasthan, Uttarakhand, Punjab, Gujarat and other states.
Managing Trustee of the Foundation Vaidya Mahendra Chaturvedi, Director, AYUSH, Maharashtra Dr Rajeshwar Reddy, Vaidyas and Professors from Mumbai region and students were present.
0000
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी
- आमदार भातखळकर यांची मागणी.
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा करण्याचे अधिकार राज्यांना आहेत असा निर्णय उत्तराखंड सरकारने नेमलेल्या समितीच्या विरोधात दाखल याचिकेवर दिला आहे. त्या संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यात ही समान नागरी कायदा आणण्यासाठी समिती गठन करण्यात यावी असे आ. भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम भगीनींना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे, त्यानुसार राज्यात समान नागरी कायदा आणल्यास खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता होईल असेही आ. भातखळकर म्हणाले आहेत.
मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक विचार करतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...





