Tuesday, 14 June 2022

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन.



            मुंबई दि. 14 : प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचे आय एन एस शिक्रा, मुंबई येथे आज हेलिकॉप्टरने दुपारी 4.00 वाजता आगमन झाले.

            यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर तसेच तिन्ही सैन्य दलांचे व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



वटवृक्ष

 *🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*

----------------------------------------

*संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*

----------------------------------------

*🏵 वटसावित्री व्रतामागील शास्त्रीय भूमिका कोणती.*


           *वटसावित्री व्रतावरील साहित्य संकलित केले, तर एक ग्रंथ तयार होईल. वटसावित्री व्रतातील महत्त्वाचे कथासूत्र म्हणजे, "सत्यवानाचे प्राण यमधर्माने हरण केले तेव्हा सावित्रीने यमधर्माशी शास्त्रचर्चा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. हा प्रसंग वटवृक्षाखाली तब्बल तीन दिवस चाललेला होता." कथेचे सूत्र अनुसरून व्रताचे स्वरूप तयार केले गेले. तीन दिवस उपवास, रात्री जागरण, वटवृक्षाची पूजा व सूत्रवेष्टन आणि शेवटी दानधर्म, उपवास म्हणजे नेहमीप्रमाणे खिचडी, वरी, फळफळावळ, दुधाचे पदार्थ भरपूर खाणे.*


           *वडाखाली जाणे होत नसल्यास वडाची फांदी बाजारात तयार असतेच. हे सर्व विडंबन पाहिले म्हणजे एखाद्या आधुनिक विचारवंत स्त्रीला वाटू लागते की, असले विकृत वटसावित्री व्रत करण्यापेक्षा न केलेले बरे. या व्रताच्या अगोदर दोन-तीन दिवस चाललेला वटसंहार पाहून विचारी मनास ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. अशाने या व्रताचा उद्देश सफल होणे दूरच, पण वनसंहार थांबवण्यासाठी वनरक्षणखात्यास एक ना एक दिवस कायद्याने वटसंहार थांबवावा लागेल.*


           *वटसावित्री व्रत खऱ्या अर्थाने करायचे असेल तर स्त्रियांनी प्रथम पतिविषयीचे सर्व गैरसमज साफ दूर करावेत. त्याच्या एवढ्यातेवढ्या विधानाची सत्यासत्यता पटवून घेण्याचा आटापिटा सोडावा. त्याच्या बारीकसारीक वर्तनास आवाहन देणे सोडावे. तो काय म्हणतो, हे आपल्याला कितपत कळते, हे पहावे. कळल्यावर ते पटते किंवा नाही हे समजून घ्यावे. एवढे केले, तरी वटसावित्री व्रताचे निम्मे फळ मिळेल. उरलेले निम्मे फळ मिळण्यासाठी वटसावित्री व्रतापूर्वी तीन, दोन किंवा निदान एक दिवस कमीतकमी खाऊन उपवास करावा. व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त काळ वटवृक्षाखाली व्यतीत करावा, पूजा करावी, जास्तीतजास्त प्रदक्षिणा कराव्यात. प्रदक्षिणा करताना हातात दोरा असलाच पाहिजे असे नाही. वटवृक्षाला पूजेच्या वेळी "वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं " म्हणून एक, तीन, पाच वेढे घालावेत.*


           *वटसावित्रीव्रतामध्ये असणाऱ्या सर्व भूमिका नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रतिकात्मक आहेत. वड हा चिरंजीव वृक्षांपैकी एक आहे. वडाची साल जुनाट व्याधी निवारक व आयुष्यवर्धक आहे, हे आयुर्वेदिक सत्य आहे. वटवृक्षाच्या सहवासात अधिकाधिक काळ घालविल्यास निरोगी दिर्घायुष्य लाभते. यमधर्म हे पात्र ही प्रतिकात्मक आहे. नीतिनियमाविषयी तयार केलेल्या संहितेस "यम" ही संज्ञा आहे. सत्यवान म्हणजे सत्याची कास धरून वागणारा. त्यालाही नीतिनियम चुकले नाहीत. पण वटवृक्षाचे सेवन केल्यास नेहमीचे नियतीचे नियम देखील अपवाद निर्माण करू शकतात.*


           *अशाप्रकारे व्रताचा खरा अर्थ व उद्देश समजून व्रत केल्यास निश्चित फळ मिळेल. पण हे व्रत विडंबनात्मक रित्या साजरे करण्यापासून नेहमी परावृत्त व्हावे. वटवृक्षाच्या सान्निध्यात जाणे सर्वथैव अशक्य असल्यास एखाद्या पाटावर चंदनगंधाने वटवृक्ष काढून पूजाप्रदक्षिणा कराव्यात. पण वडाच्या संहारास उत्तेजन देऊ नये. ज्याची पूजा करायची त्याचेच अवयव तोडणे यापेक्षा दुष्कृत्य ते कोणते ?*


*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*









 

वटपौर्णिमा

: *वटपौर्णिमेला वडाचीच पूजा का करायची?*


आपल्याकडे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे. 

   ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब फुटायला सुरवात होते. पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात.  पावसाळ्यात हवेतील बदलामुळे पचन शक्ती मंदावते,अशक्तपणा असतो. त्यामुळे ह्या दिवसात काही वेळा जुलाब होतात. वडाच्या पारंब्या ह्या जुलाबाचे उत्तम औषध आहे. वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने मुले,मोठेसुध्दा लोंबकाळून झोका घेतात. त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असते.  पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा आहे. खरे पाहता दोरा पारंब्याना बांधायला पाहीजे. म्हणजे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होईल.आणि पावसाळ्यात होणारे जुलाब थांबवायला वैद्य लोकांना मिळतील. हे त्या पूजेच्या मागचे शास्त्र आहे

  हल्लीतर शहरात वटपौर्णिमेला वडाच्या छोट्या फांद्यांचे तुकडे विकले जातात.आणि बायका घरीच वडाची पूजा करतात. ही सोय झाली.

 *माझी सर्व भगिनीना विनंती आहे की, तुम्ही वडाच्या फांदीची जरूर पूजा करा. पण दुसरे दिवशी ती फांदी टाकून देऊ नका. फांदीचे स्वच्छ धुऊन पाना सकट शक्य होईल तितके बारीक तुकडे करा व ते वाळवून त्याची मिक्सरमधे जमेल तशी पावडर करून ठेवा पावसाळ्यात घरातील कोणाला जुलाब झाल्यास त्या पावडरचा काढा करून द्या.  ह्यामूळे जुलाब लागले की हाॅस्पिलटमधे अॅडमीट होणे, वेगवेगळ्या टेस्ट करणे, सलाईन, इंजक्शने वगैरे न लागण्याची व  पैसेही वाचण्याची शक्यता आहे*.

अरविंद जोशी . B.Sc.पुणे.942194889.                                            *वटसावित्री*! 

*नवीनच लग्न झालेल्या* एका *मित्राकडे* बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी *वटसावित्रीची पौर्णिमा* होती. मी सहज *नवीन वहिनींना प्रश्‍न केला*, काय वहिनी! *झाले का बुकिंग*?तर *ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे*.असल्या *अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही*.

 सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, *‘सांग बाबा काही समजावून*!’ असे होते. मग *म्हणालो ‘वहिनी’ बसा*! *विज्ञाननिष्ठा म्हणजे काय* हो?


 *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना*? त्या म्हणाल्या *हो! बरोबर*.

 मी म्हणालो, *मग आता सांगा* *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*? मी म्हणालो,

 मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. *ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची* *श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही*? *ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती*? मग मी म्हणालो, *हे काहीच माहिती नाही*? *कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही*! तर *मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*? *बिचारीजवळ उत्तर नव्हते*. अनेकांजवळ नसते. 

*शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका*.


 *जगात सर्वात दाट सावली असते वडा ची*. वडाच्या *पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. याचसाठी *वडाची सावली अद्भुत गुणकारी* आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-

 कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌

 | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌

*|*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.

 *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य* जगात *सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड*.


 *ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*. 

*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. हे आहे *पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:*

|’ प्रकारातील *समजायची असते*. *ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा*!

ती म्हणाली *याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.* 

*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. हा *जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.

 *जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात*. *जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*

 *संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.

 *१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.

 *असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. पूर्वी *विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ अर्थात *पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.

 *शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*. 

*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’


*खूपच छान माहिती* 👌🙏

*नक्की वाचा* 🙏

स्वामी

 *🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏*


      *🙏सामर्थ्यवान प्रार्थना🙏*


या प्रार्थनेला सुमारे एक मिनिट लागतो!

प्रामाणिकपणे प्रार्थना करा.


*स्वामीं देवा मी ही प्रार्थना वाचत असताना देखील मला आशीर्वाद द्या, ! व हा संदेश एका विशिष्ठ मार्गाने पाठविणाऱ्या व्यक्तीलाही आशीर्वाद द्या करुणा सागरा,*

*आमच्या आयुष्यात आज अलौकिक अध्यात्मिक दरवाजे उघडा..कृपासिंधु,*

*देवा स्वामी समर्था,आपल्या आत्म्याचा,चेतनेचा एक दुप्पट भाग आम्हाला द्या,जेणेकरून आम्ही परत मिळवू ,आमचे भावनिक आरोग्य,शारीरिक स्वास्थ्य,आर्थिक स्थिति, परस्पर संबंध,मुले, व्यवसाय,नोकरी,घरे, आणि वैवाहिक आयुष्य.*

*मी आपले आभार मानू इच्छितो हे दयाघना! कारण जोपर्यंत तूम्ही म्हणत नाही की "सारं संपलंय"तोपर्यंत काहीही संपत नाही..हा ठाम विश्वास आहे कारण ब्रम्हांडनायक तुम्हीच आहात.*

*देवा स्वामी समर्था, तुमच्या कृपेने*

*आमची कुटुंबे आशीर्वादित आहेत;*

*आमचे आरोग्य उत्तम आहे;*

*आमचे वैवाहिक आयुष्य उत्तम आहे;*

*आम्हाला सर्व आर्थिक आशीर्वाद आहेत;*

*आमचे व्यवसाय उत्तम आहेत;*

*आमच्या नोकऱ्या उत्तम आहेत;*

*आमचे निर्णय आशीर्वादित आहेत.**

*चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आणखी येऊ घातलेल्या आहेत.*

*आमच्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा वाटेवर आहेत; ज्या आमच्या आयुष्यासाठी,तुमच्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि योजनेनुसार आहेत !*

*तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.*

🙏


(या प्रार्थनेची प्रार्थना करा,आणि मग ही प्रार्थना आपणाला माहीत असलेल्या प्रत्येकाला पाठवा.)

काही तासांतच,अगणित लोकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली असेल आणि तुम्ही कारणीभूत असाल,असा लोकसमुदाय वाढविण्यासाठी जो एकमेकांकरिता देवाला प्रार्थना करत असेल !

*🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏*

महिला लोकशाही दिंन

 प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

महिला व बालविकास अधिकारी यांचे अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई दि. 13 : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

            समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना त्वरीत न्याय मिळावा यादृष्टीने त्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी दि. 4 मार्च 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

            कोविड निर्बंधांमुळे यात खंड पडला होता. परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.

            महिला लोकशाही दिनासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 1 ला टप्पा, 2 रा मजला. आर. सी. मार्ग चेंबुर - 71 येथे उपलब्ध आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज हा महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन ही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 022-25232308 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महिला व बालविकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Monday, 13 June 2022

पाऊस

 पहिल्या पावसातील मृदगंधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३०)

पहिल्या पावसाची आतूरता माणसापुरतीच मर्यादित नाही. जमिनीतून बाहेर पडणारे चिमुकले कीटक, मुंग्या, असंख्य पक्षी, प्राणी, गवत, वनस्पती, बुरशी, शेवाळ अशा सर्वांनाच पावसाची ओढ असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वत:च्या प्रजातीचा करावयाचा विस्तार. आपल्या पश्चातही आपली प्रजाती आणि आपला वंश / अंश टिकून राहावा यासाठीची ही धडपड! ती दृश्य जीवांची असते तशीच अदृश्य जीवाणूंचीसुद्धा. गंमत म्हणजे, या जीवाणूंचाच संबंध पहिल्या पावसातील मातीच्या सुगंधाशी म्हणजे मृदगंधाशी आहे. या मृदगंधाने अनेक कल्पना, कवितांना जन्म दिला. पण त्याचा संबंध एका सूक्ष्मजीवाशी आहे. त्याचीच ही गोष्ट.


संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Soil-Smell-Reason


भवताल वेबसाईट वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी मालिकेतील ३० वी गोष्ट!

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com



Featured post

Lakshvedhi