Wednesday, 8 June 2022

 ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यात युक्रेनच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा


युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्येसामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 8: रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये अजूनही युध्द सुरु आहे. यादरम्यान युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी गेले आहेत. यातील काही विद्यार्थी परत आले असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यात युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्या राज्यामध्ये २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (३ हजार ६५० जागा), महानगरपालिकेची ५ वैद्यकीय महाविद्यालये (९०० जागा), शासन अनुदानित १ वैद्यकीय महाविद्यालय (१०० जागा), खाजगी विनाअनुदानित १९ वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार ७७० जागा) आणि १२ अभिमत वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार २०० जागा) यामध्ये एकूण ९ हजार ६२० इतक्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध आहेत. या सर्व महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. चे प्रवेश अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट-युजी प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येतात. नीट-युजीच्या गुणवत्तेच्या अभावी अथवा अन्य कारणास्तव राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी युक्रेनसह रशिया, फिलिपाईन्स किंवा इतर देशात वैद्यकीय प्रवेश घेत असतात.

            सध्या अजूनही रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युध्द सुरु असून ही युध्दाची परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येणार नाही. शिवाय युध्दासारखी परिस्थिती आल्यामुळे आता भारतासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक आपल्या मुलांना पुन्हा तेथे पाठविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेता येण्यासाठी केंद्र शासनाचे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य विभाग याबरोबरच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागमार्फत या तिन्ही ठिकाणी पाठपुरावा करुन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी परवानगी मागण्यात येईल, असे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

            भारतामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेला वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम तसेच युक्रेन या देशातील विद्यापीठांमार्फत शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम यामध्ये समानता नाही. वैद्यकीय शिक्षण पाठ्यक्रम, शैक्षणिक कालावधी, सत्र निहाय विषय व प्रात्यक्षिक यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे युक्रेन येथून एमबीबीएस अभ्यासक्रम शिक्षणाकरिता गेलेल्या व राज्यात परत येत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांबाबत केंद्र शासनामार्फत ठरविण्यात येणाऱ्या धोरणानुसार योग्य तो निर्णय घेणे योग्य राहील. 15 मे 2022 पर्यंत युक्रेन मधून महाराष्ट्रात परतलेल्या 532 विद्यार्थ्यांची माहिती, वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत संकलित करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची निवेदने, अडचणी जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले हे नोडल अधिकारी असतील, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

            ज्येष्ठ नेते खासदार श्री.पवार म्हणाले, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे ग्रंथालयही वापरता येईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना दुरस्थ शिक्षण (Foster Education) सुविधा देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण विभागाने ठेवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी दुरस्थ शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना यावेळी श्री. पवार यांनी दिल्या.

००००



 खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती                        सचिवस्तरावर समिती स्थापन करावी

                                                         - उपमुख्यमंत्री


          मुंबई, दि. 8 : राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

          मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातील इतर विविध राज्यातील खेळाडूंच्या थेट नियुक्तीबाबत असलेल्या धोरणांचा अभ्यास करुन क्रीडा विभाग, गृह विभाग, वन विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अशा विविध विभागात खेळाडूंची थेट नियुक्ती करण्याकरीता धोरण ठरविण्यात यावे. तसेच आपल्या राज्यातील प्रमुख खेळांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. तसेच मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्कारांच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात धोरणात विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, खेळाडूंच्या शासकीय सेवेत थेट नियुक्ती करताना क्रीडा विभागात सुरुवातीला पाच वर्ष काम करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरुन राज्यातील खेळाडूंना त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन मिळेल. छत्रपती पुरस्कार विजेत्यांची संख्या आणि रिक्त पदांचा धोरणामध्ये विचार करण्यात यावा. समितीने अहवाल याच महिन्यात द्यावा, असे त्यांनी यावेळी सुचविले.

          क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, खेळाडूंना नियुक्ती देताना खेळाडूंचे शिक्षण आणि पद याबाबत विचार करावा. थेट नियुक्त खेळाडूंसाठी सेवाविषयक नियमही पाहण्यात यावे.

          मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव म्हणाले की, नियुक्त समिती खेळाडूंच्या शासकीय थेट नियुक्तीबाबत अभ्यास करुन या महिन्याच्या शेवटी अहवाल सादर करेल. 

 स्त्रियांच्या सुंदरछटा..😊🥰


डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो. 

तिथे एकाच ठिकाणी 

"दूध,दही,ताक,लोणी,तूप"

बघून वाटलं की अरेच्या,ह्या तर सर्वच 👩स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..! 


पाहूया कसे ते..?


"दूध" 

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:

कुमारिका . 

दूध म्हणजे माहेर . 

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र, 

सकस, 

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं. 

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.


"दही"


कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू होते . 

दुधाचं नाव बदलून दही होतं! 

दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं!

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. 

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. "कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, 

मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी" स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ? 

नवरा हा "पती परमेश्वर" म्हणून ? नव्हे 

तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.


"ताक" 


सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं.


"दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."

'बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा खवळलेला नवरा असो (पित्त प्रकृती)'


ताक दोघांनाही शांत करतं यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.


"ताक" म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच!


'दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं .


"लोणी" 


अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं तेव्हा, 

मऊ,

रेशमी, 

मुलायम,

नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . 

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण 'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . 

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

'ताकाला' पुन्हा 'दूध' व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?


"तूप"


लोणी' ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. 

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं"


वरणभात असो 

शिरा असो 

किंवा 

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.


🌹 देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.


🌹 घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.


"दूध ते तूप" 

हा असा अनोखा 👩स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. 


"👩स्री आहे तर 👴श्री आहे हे म्हटलं वावगं ठरूं नये."


"असा हा👱🏻‍♀️स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा 

        "👩 स्त्री 👩"

 जातीस मानाचा मुजरा.ll. 

          🙏🌹🙏

भारतीय नरकाची गोष्ट

 एकदा एक व्यक्ति मेल्यानंतर नरकात पोहोचला.


त्याने पाहिले की प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही देशाच्या नरकात जाण्याची मुभा आहे.


त्याने विचार केला ....


चला अमेरिकन लोकांच्या नरकात जावून पाहू,


जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा त्याने दरवाज्यावरील पहारेकऱ्याला विचारले:


काय भाऊ ,अमेरिकन नरकात काय काय चालतं ?


पहारेकारी म्हणाला : काही ख़ास नाही,


सर्वात आधी आपल्याला एका विद्युत् खुर्चीवर एक तास बसवून शॉक दिला जाईल,


मग आपल्याला एका खिळयांच्या खाटेवर एक तास झोपवले जाईल, त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके मारेल ..... !


हे ऐकून तो व्यक्ति खुप घाबरला आणि रशियन नरकाकडे गेला, आणि तेथील पहारेकऱ्याला तेच विचारले .


राशियन नरकाच्या पहारेकऱ्याने सुद्धा तीच वाक्ये ऐकवीली जी अमेरिकन नरकाच्या पहारेकऱ्या कडून ऐकून आला होता.


मग तो व्यक्ति एक एक करत सर्व देशांच्या नरकाच्या दरवाज्यावर जावून आला,सर्व ठिकाणी त्याला भयानक किस्से ऐकायला मिळाले.


शेवटी जेव्हा तो एका ठिकाणी पोहचला,


तेथे पहातो तर दरवाज्यावर लिहिले होते "भारतीय नरक"


आणि त्या दरवाज्या बाहेर


त्या नरकात जाण्यासाठी मोठी रांग लागली होती,लोक भारतीय नरकात जाण्यासाठी उतावीळ होत होते,


त्याने विचार केला की येथे नक्की कमी शिक्षा मिळत असावी ...... ताबडतोब त्याने पहारेकऱ्याला विचारले की शिक्षा काय आहे ?


पहारेकारी म्हणाला : काही विशेष नाही


सर्वात आधी आपल्याला विद्युत् खुर्चीवर एक तास बसवले जाईल व इलेक्ट्रिक शॉक दिला जाईल.


मग एका खिळयांच्या खाटेवर एक तास झोपवले जाईल,


त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके घालेल ...!


चक्रावून त्या व्यक्तिने त्याला विचारले :


हे तर बाकीच्या देशांच्या नरकात पण होत आहे.मग इथेच गर्दी का??


पहारेकरी म्हणाला; विद्युत खुर्ची तिच आहे पण भारनियमन आहे विज नाही.


खिळ्यांच्या खाटेवरील खिळे कुणीतरी काढून नेले आहेत.


आणि फटके मारणारा राक्षस ??


तो जि.प.चा कर्मचारी आहे.


येतो सहि करतो चहा नाश्त्याला निघुन जातो.


आणि चुकून आलाचं तर एक दोन फटके मारतो.


अनं पंन्नास लीहीतो.


*चलं.....ये लवकर आतं..*


 

त्याची तीची कविता

 *मंगेश पाडगांवकर*


मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.

एवढंच की जरा *"बरी"* मिळावी.


प्रयत्न मनापासून आहेत मग...

किमान एक *"तरी"* मिळावी...!


स्वप्नात तशा खूप भेटतात...

कधीतरी *"खरी"* मिळावी.


हवीहवीशी एक जखम...

एकदा तरी *"उरी"* मिळावी...!


गालावर खळी नको तिच्या...

फक्त जरा *"हसरी"* मिळावी...!


चंद्राइतकी सुंदर नकोच...

फक्त जरा *"लाजरी"* मिळावी..!!


मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी..

एवढच की जरा *"बरी"* मिळावी..!!

( - *मंगेश पाडगावकर*)

-------------------------'----

👌👌👌👍👍👍

*तिची कविता:-*


मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा...

एवढंच की जरा *"शहाणा"* असावा.


प्रयत्न शंभर आणे आहेतच,

मग किमान एक *"आणा"* मिळावा..!


सिनेमात तसे खूप भेटतात ,

कधी तरी *"अंगणात"* भेटावा.


हवाहवासा असा छोटासा,

एक तरी *"नजराणा"* मिळावा 


नुसती छप्पन इंचाची छाती नको,

मनाचा *"सच्चा बाणा"* असावा


सूर्याइतका तेजस्वी नको,

पण प्रेमात कधी *"उणा"* नसावा


मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा

एवढंच की जरा *"शहाणा"* असावा

*----------------*

अष्टांग हृदयम!!

 आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले.

त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!

त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं.

त्या पुस्तकाचं नाव होतं, अष्टांग हृदयम!!

(Ashtang   hrudayam)

आणि याच पुस्तकात त्यांनी

आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !

हे त्यातीलच एक सूत्र आहे !!

महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!

म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage  व्हायला सुरुवात झालेली असते!

म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!

आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!

यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!

आम्लता  दोन प्रकारची असते !

एक असते  पोटाची आम्लता !

आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!

आपल्या  पोटात जेव्हा  आम्लता वाढते!

तेव्हा आपण म्हणतो  पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!

आंबट ढेकरा येतायत!

तोंडात सारखं पाणी येतय!

आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!

तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !

आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तीलाच रक्त आम्लता (blood  acidity)  म्हणतात!!

आणि  जेव्हा blood मध्ये acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त  रक्त (blood)  हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही!

आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होते !

आणि असं होतं तेव्हाच  heart  attack येतो !! त्याशिवाय heart attack नाही येत !!

आणि हे आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही!

कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे!!

काय उपाय आहे हा??

महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा रक्तात (blood) आम्लता  (acidity)  वाढलेली असेल!

तेव्हा आपल्या आहारात क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा!

आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त!!

acidic  and  alkaline

आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल! ?????

acid  and  alkaline यांना एकत्र केलं तर काय होईल ?????

neutral

होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे !!

तर वागभट पुढे लिहितात !

की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचं सेवन करावं !

*म्हणजे रक्ताची आम्लता (acidity)  neutral  होईल!!!*

आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग!

heart  attack ची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणारच नाहीं !!

अशी आहे एकंदरीत कथा !!

आता आपण साहजिकच विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत?????

आपल्या स्वयंपाक घरात असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत!

आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack  येणार नाही !

आणि जर येऊन गेला असेल !

तर पुन्हा येणार नाही  !!

आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!

हिंदीत त्याला लौकी म्हणून ओळखल्या  जातं!!

English भाषेत त्याला म्हणतात bottle  gourd  !!!

याची आपण भाजी करून खात असतो!

ह्यापेक्षा क्षारीय दुसरा कुठलाच पदार्थ नाही!

तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे !!

किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल!!

वागभट पुढं  लिहितात की रक्ताची आम्लता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच !

तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन जरूर करावं!!

किती रस सेवन करायचा ?????????

रोज  200 ते 300  मिलीग्राम रस प्यावा !!

केव्हा प्यायचा ??

सकाळी अंशापोटी (प्रातर्विधी आटोपल्यावर) पीऊ  शकता !!

किंवा नाश्ता केल्यावर अर्ध्या  तासानंतर पीऊ शकता !!

या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकताढ

याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका

तुळस फार क्षारीय आहे !!

तसंच यात आपण पुदीन्याची  ७ ते १० पानंही टाकू  शकता!

पुदीना फार क्षारीय  आहे !

याच्यासोबत आपण काळं मीठ किंवा सेंदवमिठ जरूर टाका !

हे मीठ देखील खूप क्षारीय आहे !!

पण लक्षात असू द्या

मीठ काळं वा सेंधव मीठच असलं पाहिजे !

ते दुसरं आयोडीन  युक्त मीठ  अजिबात टाकू नका !!

हे आयोडीन युक्त मीठ आम्लीय असतं !!!!

तर  मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्युसचं सेवन जरूर  करा !!

२ ते ३ महीन्यांच्या अवधीत  आपल्या   heart चे सारे blockages ठीक होतील!!

२१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा  खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल !!!

कुठल्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही !!

घरातूनच आपल्या भारताच्या आयुर्वेदानं या आजाराचा इलाज  होऊन जाईल !!

आणि आपलं हे अनमोल  शरीर आणि ऑपरेशनचे  लाखो  रुपये वाचतील !!

आपण पूर्ण पोस्ट  वाचलीत, आपणास खूप खूप धन्यवाद !!

आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतर सर्वत्र पोहोचवावी ही विनंती.

 🙏🏻जय श्रीमन नारायण नारायण नारायण🙏

Featured post

Lakshvedhi