Friday, 3 September 2021

 *एकटे असताना हदयविकाराच्या झटका आल्या आल्या ने स्वता करवायचे उपाय*


*काही दिवसांपूर्वी, मॉर्निंग वॉक वरून परतल्यावर प्रसिद्ध क्रिकेटपटू यशपाल शर्मा ह्या 1983 च्या वर्ल्ड कप खेळाडूचे वयाच्या 66 व्या वर्षी  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे खालील काही टिप्ससह तयार राहा. ज्यामुळे तुमचे आयुष्य वाचू शकते.*


  *ह्या टिप्स, डॉ. गीता कृष्णस्वामी यांच्या आहेत. कृपया तुमची 2 मिनिटे द्या, हे वाचा:*


 *१.  समजा संध्याकाळी 7.25 वाजले आहेत.   तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणाहून घरी परतत आहात (अर्थातच एकटे).*


  *२.  तुम्ही खरोखर थकलेले, अस्वस्थ आणि निराश आहात.*


 *3 अचानक तुम्हाला तुमच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागतात. ज्या तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या जबड्यात ओढू लागतात.  तुम्ही तुमच्या घराजवळील हॉस्पिटलपासून फक्त पाच किमी अंतरावर आहात.*


  *4.  दुर्दैवाने तुम्हाला माहित नाही की तुम्ही ह्या वेदना तीतपर्यंत सहन करू शकाल का.*

  *५.  तुम्हाला सीपीआरचे प्रशिक्षण दिले गेले आहे. पण ज्याने हा कोर्स शिकवला त्याने, हे स्वतःसाठी कसे वापरावे हे शिकवलेले नाही.*


  *6.  एकटे असताना हृदय विकाराच्या झटक्याचे आक्रमण कसे रोखायचे?*  


 *हृदयविकाराचा झटका आल्यावर एकटे असल्यावर व मदतीशिवाय असल्यावर,   चेतना गमावण्यापूर्वी  त्याच्याकडे फक्त 10 सेकंद शिल्लक असतात.*


*7.  तथापि, त्या व्यक्तीने वारंवार आणि अतिशय जोमाने खोकल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.      यासाठी, प्रत्येक खोकल्याआधी एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे आणि खोकला खोल आणि दीर्घकाळ असावा, जसे छातीच्या आतून थुंकी निर्माण करताना होतो तसा. मदत येईपर्यंत किंवा हृदयाला पुन्हा सामान्यपणे धडधडल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत प्रत्येक दोन सेकंदात एक श्वास आणि खोकला न सोडता त्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.*


  *8.  खोल श्वासांमुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन येतो आणि खोकल्याच्या हालचाली हृदय पिळून घेतात व रक्त संचारण ठेवतात.  हृदयावर वाढणारा दबाव देखील सामान्य लय परत मिळवण्यास मदत करतो.  अशा प्रकारे, हृदयविकाराची व्यक्ती रूग्णालया पर्यंत पोहोचू शकते.*


 *9.  सर्व लोकांना, शक्य तितक्या लवकर याबद्दल सांगा.  ह्या मुळे त्यांचे आयुष्य वाचवू शकते !!*


  *10.  कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की, जर प्रत्येकाने  हा मेल 10 जणांना पाठवला तर  किमान एक जीव वाचू शकतो.*


  *11.  विनोद पाठवण्यापेक्षा, कृपया ... हा मेल फॉरवर्ड करून योगदान द्या. ज्या मुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.*


  *12.  जर हा संदेश तुमच्या आजूबाजूला आला तर ... एकापेक्षा जास्त वेळा ... कृपया चिडचिड करू नका ... त्याऐवजी तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुमचे अनेक मित्र आहेत जे तुमची काळजी करतात आणि तुम्हाला हार्ट अटॅकचा सामना कसा करावा याची आठवण करून देत राहतात.*


 *कृपया तुम्ही जमेल तितक्या लोकांना हा अत्यंत महत्वाचा संदेश शेअर करा.   जीव वाचवण्यात मदत करा.*

🙏🏻🙏🏻🙏🏻

 मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला, 

NO PARKING ZONE

PENALTY  Rs.250/-

कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.

 काही दिवसांनंतर तेथून एक नगरचा माणूस गेला.  त्याने तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि... त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.

 बोर्ड मधून No आणि Penalty शब्द खोडले. आता बोर्ड झाला,

PARKING ZONE

Rs 250/-

आता लोकांनी गाड्या उभ्या करणे थांबवले.

मुंबई पोलीस त्या नगरकर  माणसाला शोधत आहेत.


😁😁😁😃😃😃😃😃


*नेहमी पुणेकरांनीच हूशारीनं वागयचं का कायं?* 😆😆🤣🤣

 घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी

कालबद्ध कार्यक्रम आखून युद्धपातळीवर मोहीम राबवा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा

 

            मुंबई दि. 2 : - जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे  उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि  ते आपल्याला करावेच लागेल. २०२४ पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

            वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,मुख्य सचिव सीताराम कुंटेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीपाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदेग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्तामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकरजलजीवन मिशनचे अभियान संचालक प्रवीण पुरीसहसचिव चंद्रकांत गजभिये आदि मान्यवर उपस्थित होते.

निधी कमी पडू देणार नाही

            राज्याचे नळजोडण्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली.

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे

            जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत जी पदे रिक्त असतील ती पदे भरेपर्यंत आवश्यक अभियंत्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात बाह्ययंत्रणे मार्फत घेण्यात याव्यात तसेच इतर विभागातील पदांचा आढावा घेऊन आणखी आवश्यक असलेले अभियंते त्या विभागाकडून उपलब्ध करून घ्यावेत जेणेकरून कामांना गती येईल.याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव यांनी बैठक आयोजित करावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केली.

मुख्य सचिवांनी आढावा घ्यावा

             जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा. मुख्य सचिव यांनीही याबाबत आढावा घ्यावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

             पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेजलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी पोहचविण्यासाठी या वर्षासाठी  ७ हजार ६४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तेवढाच निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे.अशा प्रकारे १४ हजार १२८ कोटी रुपये उपलब्ध होतील.

            जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत ३८ हजार ६५३ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २४ हजार ९४९ कोटी रुपये खर्च येणार आहे.२०२१-२२  या वर्षात मार्च अखेर पर्यंत २९ हजार ८५३ योजना पूर्ण करण्यात येणार आहेत.त्यासाठी १२ हजार ९५० कोटी रुपये खर्च येणार आहे.हे  निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची गतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाच कोटी रुपयांवरील २०० योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहेत आणि डिसेंबर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

            जल जीवन मिशन हे एक आंदोलन आहे,तो एक उत्सव आहे.यामध्ये सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. 'हर घर जलहर घर नल'  उक्तीप्रमाणे प्रत्येक घरापर्यंत पाणी  पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  प्रयत्नशील असून नळजोडण्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा अशी सूचनाही श्री.पाटील यांनी यावेळी केली.

नळजोडण्यांचे ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

            जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत  ९३ लाख ६ हजार नळजोडण्यांचे काम ( ६५ टक्के काम) पूर्ण झाले आहे.उर्वरित ४९ लाख २९ हजार नळजोडण्यांचे काम बाकी आहे.त्यापैकी सन २०२१-२२ या वर्षात २७ लाख ४५ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.मागील वर्षी राज्यात ३७ लाख नळजोडण्या देण्यात आल्या.घरातील प्रत्येकाला म्हणजे प्रति माणसी प्रति दिन ४० ऐवजी ५५ लिटर  पाणी पुरवण्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

            राज्यात आतापर्यंत शाळांमध्ये ८६ टक्के तर अंगणवाड्यांमध्ये ७७ टक्के नळ जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले  आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

00000

 रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या

अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबईदि. 2 : अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी  अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढण्यात येईल व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            वर्षा येथील समिती कक्षामध्ये आंबा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

            या बैठकीला कृषी मंत्री  दादाजी भुसेसिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंतमाजी राज्यमंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहकृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेस्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेअतिवृष्टीमुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकरी बांधवांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. याबाबत सहकार विभागाशी चर्चा करुन लवकरच शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

            पालकमंत्री उदय सामंत म्हणालेगेली चार वर्ष आंबा पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात आले आहेत. बँकाकडून घेतलेली पीक कर्जाची रक्कम थकीत झाली आहे. परिणामी बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे.  व्याजासह कर्ज रक्कम न भरल्यास शेतकऱ्यांना नोटिस देण्यात येत आहेत.

            सन २०१४-१५ मध्ये  अवकाळी पाऊस झाला.त्यावेळी शासनाने पीक कर्जावरील तीन महिन्याच्या व्याजाची रक्कम माफ केली. परंतु ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. तसेच पुनर्गठित कर्ज रकमेवरील पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकऱ्यांकडून मात्र बँकांनी वसुली केली आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठन प्रक्रिया होणे आवश्यक आहे.

            बैठकीत आंबा पिकावरील फवारणीसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांवरील किंमती नियंत्रणात आणणे व त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटी करांमध्ये सवलत मिळण्याबाबत विचार व्हावा याबाबत ही चर्चा करण्यात आली.तसेच आंबा हंगाम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू असतो. विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी आंबा हंगामासाठी पाऊस पडण्याच्या  निकषामध्ये दि.१५ मे पर्यंत पाऊस पडला असेल तरच  नुकसान भरपाई मिळते. परंतु याचा फायदा रत्नागिरीतील उत्पादकांना मिळत नाही. या भागात तारखे मध्ये बदल करून ती दि.३१ मे पर्यंत तारीख निश्चित करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.

0000

 *...दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात...🙌*

*...जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची..?*

*...शेवटी काय.!*

*...हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा..😊*

         *🌹💞 💞🌹

  🌾🍁 *शुभ सकाळ*🍁🌾

 राजमाता जिजाऊंचं " पाचाड ".....


पाचाड गावाला यापेक्षा वेगळी ओळखच नसावी ....कारण ज्या महाराष्ट्रकन्येने जिथं अखेरचा श्वास घेतला त्या पावनपवित्र भूमीत राहणारे भाग्यवान .....जितका मान श्रीरायगडाला , तितकाच सन्मान आपल्या पाचाडभूमीला......


पाचाड शब्दाची सरळसोपी व्याख्या पाच आड ......आजही होळकरबाव , तक्क्याची विहीर , आणखी एक पाचाड कोटातील विहीर , अशा पाच सहा विहीरींचं गाव म्हणजे पाचाड.....खरं म्हणजे हे गाव अश्मयुगीन कालखंडातील असल्याची खूण म्हणजे वाघबीळात सापडलेली दगडी हत्यारे.......ज्या वाघबीळाला ब्रिटिशांनी " गन्स ऑफ पाचाड " असंही संबोधलं होतं.......पाचाडहून रायगडाकडे जाताना खिंडीत 5 ते 7 लाख वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन मानवांचं निवासस्थान असलेली ही गुहा तीन तोंडाची आहे ......नैसर्गिक सुरक्षा लाभल्याने शिवकाळात टेहळणीची चौकी म्हणून वापर केला जात असे......


वाघबीळाकडून पुन्हा पाचाडच्या दिशेने येताना , उजवीकडे " नकट्याचा माळ " पाहायला मिळतो .....तिथं भग्न शिवपिंडी , दोणी , देवदेवतांच्या मूर्ती, आहेत.....नकट्याच्या माळाबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते ......छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर अटक करायला जाताना , कटकारस्थानी मंत्र्यांनी एका पाईकाला आज्ञा दिली कि जर यदाकदाचित शंभूराजे रायगडी आलेच तर त्यांना गडावर जाण्यापासून रोखायचे ......याचवेळी छत्रपती शंभूराजे या माळाच्या ठिकाणी पोहोचताच त्या आज्ञाधारक सैनिकाने त्यांना अडवले .....राग अनावर होऊन त्या पाईकाचे नाक कापल्याने त्या जागेला आजही " नकट्याचा माळ " असे बोलले जाते......एक अनामिक वीराचा समाधी चौथराही तिथं पाहायला मिळतो.....


आत्ताच्या देशमुख हाॅटेलसमोर पायर्यांची विहीर जिला " होळकरबाव " असं बोलले जाते......पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात अनेक गावामध्ये बारव  म्हणजेच बांधीव विहिरी बांधण्यात आल्या....त्यापैकी ही इंग्रजी " L " आकाराची विहीर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.......शेडगे उपहारगृहाच्या शेजारी एक हनुमान मंदिर आहे.....शिवकाळातील वेशीवरचा मारूती आहे तो......कारण जिजाऊंचा वाडा , बौध्दवाडी आणि मूळ पाचाड गावाची वेस इथं आहे.....परंतु आत्ता हाॅटेल , दुकानं आणि नवीन घरांच्या गर्दीत " वेशीवरचा मारूती " मात्र दुर्लक्षित झालाय.......पाचाडचं शेडगे घराण्यातील व्यक्ति बंजरंगबलीची पूजा करतात.....


पाचाड गावातील राजमाता जिजाऊंचा राहता वाडा म्हणजे पाचाडचं वैभव ......तसा तो भुईकोट किल्लाच ....एक हेक्टर जमीनीत दक्षिणोत्तर पसरलेल्या वाड्यात चार पाच वर्षे वास्तव्य होतं......रायगडावरील थंड बोचरी हवा जिजाऊंना सोसत नव्हती म्हणून महाराजांनी बांधलेला हा वाडा.....तीनदा हा कोट उध्वस्त केला गेला तरीही त्याचं मराठेशाहीतील रूप मनात भरतं......हवालदाराची चौकी , सबनीसाचा घरटा , राजसदर , दस्तुरखुद्द जिजाऊंचं निवाससस्थान , लोडबाव , पश्चिमेला असलेली पागा , तलाव , हे सारं आजही पाहता येतं.......छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकानंतर अवघ्या  अकरा दिवसांनी जिजाऊंना इथंच देह ठेवला.......कधीही इथं गेलात तर सदरेच्या मागे असलेल्या भव्य इमारतीच्या चौथर्यावर अनवाणी जा ....तिथलं पावित्र्य राखा.....जमलंच तर तिथली माती कपाळी लावा......काही शतकांपूर्वी आमच्या छत्रपतींची माऊली तिथं विसावली आहे.......मावळेहो मुजरा करा .....


" जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ! भली शोभली ज्यास जाया जिजाई " असं जयराम पिंडे या कविने ज्यांचं वर्णन केलं आहे त्या राष्ट्रमातेचं स्मारक वृंदावनही याच पाचाड मध्ये आहे ......या स्मारक वृंदावनाच्या समोरील भागात भग्न शिवमंदिराचे अवशेष दिसतात......शिवपिंडी , नागशिळा , गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते......या स्मारकाच्या पिछाडीपासून ते थेट कोंझर रस्त्यापर्यत जो परिसर आहे त्याला स्थानिक लोक " घोडधाव " म्हणतात......शिवकाळात साधारण दहा हजारांचं घोडदळ , पायदळ या परिसरात सज्ज असायचं  ......


पाचाडचं ग्रामदैवत श्री सोमजाई ......शिवकाळापासून या देवतेला मान आहे .....मंदिरासमोर काही समाधीशिळा आहेत.......मराठा कालखंडातील कुणा तोलामोलाच्या सरदारांची स्मारकशिळा असावी असा अंदाज करता येतो......


पाचाड गावात घाडगे , कदम , पवार , शेडगे , पाचाडकर , गायकवाड,  मुजावर , या आडनावाची कुटुंब राहतात......शेडगे घराण्याकडे पाचाडच्या भुईकोटाचं कारभारी पद होतं......श्रीपती शेडगे , तुकाराम शेडगे आणि आत्ता आमचा मित्र मंगेश शेडगे अशा कित्येक पिढ्या रायगडच्या सेवेत रूजू आहेत......पाचाड मध्ये पेठ असल्याचाही उल्लेख कागदपत्रांत सापडतो.......पेशवेकाळात गुजर वाणी इथं स्थायिक झाल्याची नोंद सापडते.......


पाचाडातून कोंझरगावाकडे जाताना , डावीकडे एक चौथरा लक्ष वेधून घेतो.....हीच ती मालसावंताची चौकी......गोवेलेच्या मालसावंतानी महाराजांशी एकनिष्ठेने स्वराज्यकार्य केले .....याच चौकीपासून पश्चिमेकडील शेताच्या बांधाबांधावरून गेल्यानंतर एका ओहोळाच्या शेजारी अतिशय सुबक , भव्य अशी समाधी दिसते......हीच ती सावंताची समाधी .....इतक्या आडरानामध्ये अशी नक्षीकाम केलेली समाधी कशी असू शकते हा प्रश्न  आपल्याला पडतो.......रायगडाला जाणारे शेकडा 90 टक्के शिवभक्त हे पाहत नाहीत......समाधीच्या शेजारीच भव्य जोते आणि शिवपिंड दिसते.....शिवकाळातील त्या भव्य जोत्यावरून चौकीपहारा किती महत्त्वाचा होतो हे लक्षात येतं.......यालाच सावंताचं मेट असंही बोललं जातं......पाचाडच्या या परिसरात पूर्वी अन्नछत्रही चालत असे......


असं हे ऐतिहासिक पाचाड अनुभवण्यासाठी तिथला कानाकोपरा कधीतरी भटकंती करा.....नाचणटेपाची गुहा , होळकरबाव , पाचाडचा भुईकोट , वेशीवरचा मारूती , नकट्याचा माळ , सावंतांचं मेट , सगळं याची देही याची डोळा नजरेत सामावून घ्या.......



शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव रायगड

 [02/09, 12:29] B Vaishali: *गंमत*


आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी 

इत्यादी घरी करून पाहिले जातात 


आणि 


कुरडई  पापड, लोणची 

विकत घेतात..!

😂😂🤥🤥


*दुसरी गंमत* याऊलट म्हणजे,

घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात 😜


*तिसरी गंमत* याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.


       आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.


आहे की नाही गंमत 😜 😜 🤪🤐😷

[02/09, 13:13] B Vaishali: जगातले सगळे रेकॉर्ड 

तुटले ,

जेंव्हा होमीओपॅथी

डॉक्टरच्या बायकोने 

" फोन "

करुन मिस्टरांना सांगीतले की


"घरातला साबुदाणा संपलाय

येताना क्लिनीक मधला 

थोडासा घेऊन या"

😃😃😃😃😃😃😃

Featured post

Lakshvedhi