Tuesday, 24 August 2021

 विविध योजनातील अनुदान

शेतकऱ्यांना तातडीने द्यावे

-  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

            मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

            फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवलेकृषी आयुक्त धिरज कुमार, संचालक डॉ.के. मोने तसेच संबंधित कृषी व फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            फलोत्पादन मंत्री श्री भुमरे म्हणालेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेपीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत. याचबरोबर फलोत्पादनाच्या विविध कामांचा आढावा यावेळी मंत्री श्री. भुमरे यांनी घेतला.

            स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो कायाबाबत अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी. रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी. फळबागठिबक सिंचनशेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

 जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

·        मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला गोविंदा पथकांचा सकारात्मक प्रतिसाद

 

            मुंबई दि. 23 : काही काळासाठी आपले सणवारउत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊयासंयम  आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूयाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहेहे देखील श्री.ठाकरे यांनी स्पष्ट केले.

            आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.  उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू  अशी भावना व्यक्त केली.

            बैठकीस  उपमुख्यमंत्री अजित पवारगृहमंत्री दिलीप वळसे पाटील,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरातपरिवहन मंत्री अनिल परबआमदार सुनील प्रभू,  आ. प्रताप सरनाईक,  माजी मंत्री सचिन अहीरमाजी आमदार बाळा नांदगांवकरमुख्य सचिव सीताराम कुंटे,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,   आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यासमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहलमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य डॉ. शशांक जोशी,  डॉ. राहूल पंडितबाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभुडॉ. अजित देसाईविविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त,  पोलीस अधिकारी,  दहिहंडी समन्वय समितीचे  पदाधिकारीगोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

पहिल्यांदा आरोग्याचा विचार

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीसणवारउत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो.  मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोतत्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेतपण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.

जगभराचा अनुभव कटू

            सगळे जग या विषाणूने त्रासलेले आहे. गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झालीज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्याकुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली,  त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटेतला आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटु आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशात पुन्हा निर्बंध लावले जात आहेत.

अजूनही काळजी घेण्याची गरज

            नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे.  हा विषाणू घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. आपल्याकडेही काही जिल्ह्यात दुसरी लाट जोरात आहे. काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा विंडो पिरियड आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपले अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.

तर नाईलाजाने...

            आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून  आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीआपण आपली आरोग्य व्यवस्था सक्षम करत आहोतआपण एकाच दिवशी ११ लाख लोकांचे लसीकरण करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.  आपण ऑक्स‍िजनआय.सी.यु बेडची संख्या वाढवत आहोत. पण आपली ऑक्स‍िजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकीच मर्यादित आहेत.  इतर रुग्णांना लागणारी ऑक्स‍िजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्स‍िजनची मागणी  ७५० मे.टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सहकार्य कायम ठेवा- अजित पवार

            महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाहीत्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहेडेल्टा प्लस विषाणू घातक आणि वेगाने पसरणारा आहे, हे सगळे सांगितले जात असतांना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणानेघरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे असे आवाहन केले. संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल हेही श्री.पवार यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबर अर्थचक्र सुरळित ठेवण्याला प्राधान्य

            अर्थचक्र सुरु राहण्यासाठी काही निर्बंधांमध्ये सुट देण्यात आली असून शासनाचे पहिले प्राधान्य हे आजही लोकांची सुरक्षितता आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याला असल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पुढच्या काळातही सावधगिरीने पुढे जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

अधिकारी आणि मान्यवरांची मते

            या उत्सवात  मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग सहभागी होतो जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नसल्याचे आयुक्त चहल यांनी यावेळी सांगितले. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटने तसेच नीती आयोगाने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याची माहिती दिली. बहृन्मुंबई पोलीस आयुक्त श्री. नगराळे यांनी आयुक्तांच्या सूचनेला दुजोरा दिला. कोरोनाकाळात  गणेशोत्सवासह सर्व सण  साधेपणाने साजरे करण्याची गरज  त्यांनी व्यक्त केली.

              डॉ. संजय ओक यांनी दहिहंडीचा उत्सव हा अतिशय जवळूनएकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहेया खेळात मानवी थर रचले जात असतांना एकमेकांना  जवळून स्पर्श होतोथर लावतांना अंगावर पाणी टाकले जातेपावसाळा सुरु आहेपाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते हे सांगतांना ‘डेल्टा प्लस’ हा विषाणू घातक असून तो वेगाने पसरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. दहिहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आजही आपण आपले आप्तस्वकीय गमावत असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि हा सण आपण  रक्तदानऔषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करूआपल्या उत्सवाचे स्पीरीट वेगळ्या पद्धतीने जपू  असे आवाहन केले.

            डॉ. पंडित यांनी हा सण आपला आवडता असला तरी कोरोनामुळे तो आपल्या साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले विविध देशात ज्यांच्या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत तेथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घेतलेल्या भयानक स्थितीची त्यांनी माहिती दिली.

            हा उत्सव गर्दीत आणि अतिशय जवळून मानवी संपर्कातून साजरा होतो जो कोरोना संसर्ग वाढवण्याला कारणीभूत ठरू शकतो असे सांगून डॉ. जोशी म्हणाले कीआता कुठे आपण दुसरी लाट काही ठिकाणी नियंत्रणात आणू शकलो आहोतअर्थचक्र सुरु करण्यासाठी काही निर्बंध शिथील करू शकलो आहोतत्यामुळे आपल्याला संसर्ग वाढवून चालणार नाही. डॉ. सुहास प्रभुडॉ. अजित देसाई यांनी देखील यावेळी आपली भूमिका विशद केली.

...

 


 

कोरोनाविषयक ब्रेल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

·        दृष्टिहीन लोकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती आता हिंदी भाषेतून

           

            मुंबई, दि. 23 : दृष्टिहीन व्यक्तींमध्ये कोरोना विषयावर जनजागृती करणाऱ्या ब्रेल लिपितील कोविड – १९ बिमारी और इलाज’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.23) राजभवन येथे करण्यात आले.

            पुस्तकाचे लेखकसर्पमित्र व स्काऊट गाईड जिल्हा आयुक्त भरत जोशी यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. यावेळी दृष्टिहीन व्यक्तींनी ब्रेल लिपितील पुस्तकांचे उतारे वाचून दाखविले.

००००

 

Governor releases Braille book on Covid-19 awareness

 

            Governor Bhagat Singh Koshyari released a Braille book on the subject Covid-19 and its remedy at Raj Bhavan Mumbai on Monday (23 Aug).

            The book in Hindi has been authored by Sarp Mitra and District Commissioner of  Scout and Guide Bharat Joshi with a view to creating awareness about COVID 19 among visually impaired persons.

            Three visually impaired girl students demonstrated their Braille book reading skills on the occasion.

 ठाणे जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी

एकलव्य निवासी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

 

अनुसूचित जमातीआदिम जमातीपारधी जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

          मुंबई दि २४- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यात आठ निवासी शाळा कार्यान्वित आहेत. या शाळांच्या इयत्ता ६वी च्या वर्गासाठीतसेच इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने ३१ ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावेत असे अवाहन प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            ठाणे विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जिल्हा पालघर येथील डहाणूजव्हार तसेच शहापुर अंतर्गत एकुण आठ एकलव्य निवासी शाळा कार्यान्वित आहेत. या शाळेमध्ये इयत्ता ६ वीच्या वर्गात नियमित प्रवेश २४० मुले व २४० मुली तसेच इयत्ता ७ वीच्या वर्गात मुले ५७ व मुली ५२इयत्ता ८ वीच्या वर्गात मुले ३३ व मुली ३८ आणि  ९ वी च्या वर्गातील मुले ४ अशा  रिक्त जागा भरणेकरीता अनुसूचित जमाती / आदिम जमाती / पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

             शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येतेतसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच निवासअंथरुण-पांघरुणभोजनगणवेषपाठयपुस्तकेवहया व शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमव्यवसाय प्रशिक्षण आणि इतर विशेष पाठ्योत्तर कार्यक्रम यासाठी विशेष लक्ष पुरविण्यात येते.

            रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याकरीता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या लिंकवर आवेदनपत्र ऑनलाईन भरुन त्यासोबत विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टल वरील Student ID माहित असणे आवश्यक असल्याचेही प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी सांगितले आहे.

0000


 

आदिवासी विकास विभागाकडून शिधापत्रिका,

जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन

           

            नाशिक दि. 23 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांच्या पुर्ततेत शिधापत्रिका व जातीचा दाखला महत्त्वपूर्ण आहे. या कागदपत्रांच्या अभावामुळे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात 1 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्याकरीता आदिवासी विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहेअशी माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसारआदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या बांधवांसाठी शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्यासाठी राबविण्यात येणारी विशेष मोहिम सर्व अपर आयुक्त यांच्या अखत्यारीत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व प्रांत अधिकारी यांच्यामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात यावी. या शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारे शुल्क हे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लियस बजेट) या योजनेतून अदा करण्यात येणार असल्याने स्थानिक स्तरावर हे दाखले विनामुल्य उपलब्ध होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

            शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणारी विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांना देखील आवाहन करण्यात येत आहेअसे आदिवासी विकास आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


 

विविध योजनातील अनुदान

शेतकऱ्यांना तातडीने द्यावे

-  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

            मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

            फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवलेकृषी आयुक्त धिरज कुमार, संचालक डॉ.के. मोने तसेच संबंधित कृषी व फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            फलोत्पादन मंत्री श्री भुमरे म्हणालेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेपीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत. याचबरोबर फलोत्पादनाच्या विविध कामांचा आढावा यावेळी मंत्री श्री. भुमरे यांनी घेतला.

            स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो कायाबाबत अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी. रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी. फळबागठिबक सिंचनशेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

 शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्यावे

-  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

            मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

            फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवलेसंचालक डॉ.के. मोने तसेच संबंधित कृषी अधिकारी उपस्थित होते.

            फलोत्पादन मंत्री श्री भुमरे म्हणालेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेपीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत. याचबरोबर फलोत्पादनाच्या विविध कामाचा आढावा यावेळी मंत्री श्री. भुमरे यांनी घेतला.

            स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो कायाबाबत अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पुर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी. रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी. फळबागठिबक सिंचनशेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

0000


 *सुप्रीम कोर्ट के आदेश और भारत सरकार के निर्देशानुसार कोई भी अधिकारी या डॉक्टर आपको कोरोना वैक्सीन या कोई अन्य वैक्सीन लेने के लिए मजबूर नहीं कर सकता है* - June 26, 2021


∆ *यदि आप टीका नहीं लगवाना चाहते हैं। तो आपको यह निर्णय लेने का पूर्ण अधिकार है*


∆ *उच्च न्यायालय ने फैसला सुनाया है कि, जिन नागरिकों को पूरी जानकारी के बिना टीकाकरण के लिए मजबूर किया गया है। टीका लगाया गया है। धोखा दिया गया है, या टीकाकरण के लिए मजबूर किया गया है। उन्हें मुआवजे की मांग करने का अधिकार है।*


∆ *मानवाधिकार सुरक्षा परिषद और इंडियन बार असोसिएशन ने पीड़ितों को एक करोड़ रुपये अग्रिम मुआवजे (Interim Compensation) देने  की मांग की है।*


*नई दिल्ली :- नागरिकों को गुमराह करके उन्हें टीकाकरण के लिए बाध्य करने वाले अधिकारियों के खिलाफ कानूनी कार्रवाई तथा नागरिकों के मानवाधिकारों और मूलभूत संवैधानिक अधिकारों का उल्लंघन करने के लिए प्रत्येक  पीड़ित नागरिकों को कम से कम अग्रिम मुआवजा 1 करोड़ रुपये सरकार उन्हें देना और वह राशि आरोपियों से वसूल करने की मांग मानवाधिकार सुरक्षा परिषद के राष्ट्रिय महासचिव रशीद खान पठान तथा इंडियन बार असोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश ओझा ने की है।*


अ‍ॅड. निलेश ओझा 

                                   राष्ट्रीय अध्यक्ष

                            इंडियन बार  एसोसिएशन


https://supremecourtnewss.blogspot.com/2021/06/blog-post_26.html


*भारत सरकार के निर्देश और मा. सर्वोच्च न्यायालय तथा मा. उच्च न्यायालय ने भी फैसला सुनाया है । कि, वैक्सीन किसी के लिए बाध्यकारी नहीं है। मा. सर्वोच्च न्यायालय और मा. उच्च न्यायालय का भी दिया हुआ फैसला इंडियन बार असोसिएशन की वेबसाइट पर उपलब्ध हैं।*


Blog Link:- https://indianbaras sociation.in/vaccination-is-not-mandatory-as-per-the-latest-judgment-of-high-court/


*इसी आदेश के अनुसार, प्रत्येक व्यक्ति आयुर्वेदिक, प्राकृतिक चिकित्सा, होम्योपैथी, यूनानी या किसी अन्य उपयुक्त उपचार पद्धति से अपना इलाज कर सकता है।*


*कोरोना वैक्सीन लेने से कई जानलेवा दुष्परिणाम सामने आए है, वैक्सीन की दोनों खुराक लेने के बावजूद भी कई लोंगो की कोरोना से मृत्यू हुई है और इसका सबसे बड़ा उदाहरण यह है कि, इंडियन मेडिकल असोसिएशन के मा. अध्यक्ष के. के. अग्रवाल वैक्सीन की दोनों खुराक लेने के बाद भी उनकी कोरोना से मौत हो गई।*


*इंडियन बार असोसिएशन ने उन्हें ५१ पन्नों की कानूनी नोटिस ( Legal Notice ) देते हुए डॉ. सौम्य स्वामीनाथन को, हुए प्रत्येक नागरिकों की हत्या के लिए जिम्मेदार ठहराते हुए उनके विरुद्ध भारतीय दंड सहिंता  ( I. P. C) के तहत ३०२ , ३०४, १८८, १२० (ब) r/w ३४ के अनुसार करवाई करने का इशारा दिया।*


*नोटिस मिलते ही विश्व स्वास्थ्य संगठन [ डब्ल्यू. एच.ओ / WHO ] की मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्य स्वामीनाथन ने घबराकर आइवरमेक्टिन के विरुद्ध में किये हुए 'ट्वीट' को डिलीट (Delete) कर दिया।*


*इंडियन बार असोसिएशन के प्रयास से  डब्ल्यू. एच.ओ [ WHO ] के अधिकारियों के झूठ और जनता को मुर्ख बनाकर उनके जीवन से खिलवाड़ करने तथा जीवन निर्वाह का हनन करके उनको गरीब बनाने का प्रयत्न सामने आ गया |*


*सभी नागरिकों से निवेदन है कि वे अपने डॉक्टरों के सलाह से आइवरमेक्टिन या आयुर्वेदिक या नॅचरोपॅथी के सहायता से उपचार करके अपने परिवार का जीवन और पैसा बचाकर तथा पुरे देश में फीर लॉकडाऊन ना लगने में सहायता करे।*


*इसी प्रकार , इस मुद्दे पर अनेक लोगों में जानकारी पहुचाये और जन - जागृती फैलाने का प्रयास करते हुए इस राष्ट्रीय आंदोलन में अपना सहयोग करें।*


नोट:i) वैक्सीन कंपनियों के निर्देशानुसार एलोपैथी दवाईओं के उपभोक्ता तैयार करने के लिए वैक्सीन (VACCINE) लगवाई जा रही है


अर्थात भूल कर भी वैक्सीन (VACCINE) ना लें बचे भारतीय

 ✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती 

हारल्यानंतरही Smile😊 देते ना,

✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 

जिंकण्याचा आनंद गमावून बसते....


    💞शुभ सकाळ💞

 *माहितीसाठी सांगतोय,*

*पुण्यात पण तालिबानी राहायचे बरं का..!*

*तात्यासाहेब फुलेंच्या शिक्षणाला विरोध करायचे...*

*आई सावित्रीबाईंना शेण, चिखल आणि दगडगोटे मारायचे..*

Featured post

Lakshvedhi