Wednesday, 11 August 2021

 💐🌸🌷🍀🍂🌿🌹🌼🌻🍁🌺


        *☝🏻कोण होती भवानी ?*

                     ✍️

महाराष्ट्र राज्यात , मु.पो. सांबरी, ता.अलिबाग ,जि.रायगड या ठिकाणी *भवानी बाई पाटील व हिराबाई पाटील* या दोन जुळ्या बहिनी राहत होत्या.


           इ.स.१६२५/२७ दरम्यान कार्ला संस्थान येथे पोर्तुगीजांचा व्यापार होता तिथे बायकांची विक्री होत असे. हे जेंव्हा *जिजामातांच्या* लक्षात आलं तेंव्हा त्यांनी *शहाजी महाराजांना* ती बातमी सांगितली. 


जनावराप्रमाणे बायकांची विक्री होणे त्यांना पटल नाही हे थांबलं पाहिजे असं त्यांना वाटलं.


तेंव्हा तो व्यापार *शहाजी महाराजां* समवेत जाऊन त्यांनी बंद पाडला व तेथे विक्री साठी असलेल्या *भवानीबाई व हिराबाई* ला सोबत घेऊन आल्या.


       त्यानंतर १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर *शिवरायांचा* जन्म झाला.


         *शहाजी राजे* मोगल सैन्याशी लढाई करत असतांना त्यांना कल्याण पारगण्यात सहा महिने भुमिगत रहावं लागलं. ( म्हणुनच तो प्रांत *शहापुर* या नावाने प्रसिद्ध झाला.)


       शिवनेरी गडावर निवडक सैन्य होते. व त्यांचा म्होरक्या अर्थात सेनापती साताऱ्यातील वेलंग गावचा *सिद्धनाथ महार* होता.


           *शिवाजी महाराजांच्या* जन्मानंतर पाच वर्षे किल्ला लढविल्यावर किल्ल्यावरील रसद संपत आली. तेव्हा *माँ साहेब जिजाऊंनी*,  निर्णय घेतला , व हिराबाईला सोबत (विश्वासात) घेऊन मोगल सेनापतीला चर्चेत गुंतवलं, आणि *भवानी बाई* पाटील बाळ शिवरायांना घेऊन *साबरी* गावी निघून गेल्या. भवानी बाईने शिवराय ५ ते १२ वर्षाचे होईपर्यंत त्यांचं आई प्रमाणे संगोपन केल.


         इ.स.१६४२ मध्ये *तुकाराम महाराज* कोकण दौऱ्यावर असतांना त्यांनी *जिजाऊ* आणि *भवानीआईची* भेट घडवून आणली. तेंव्हा *जिजाऊं* च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 


आपल्या मुलाचं संगोपन *भवानी* ने उत्तम पध्दतीने केले ते पाहून त्या भावुक झाल्या.आणि *भवानी आईला* म्हणाल्या *"तु माझ्या बाळाला पोटच्या आपत्यां प्रमाणे वाढवलंस,मी तुला वचन देते भविष्यात जेंव्हा केंव्हा माझ्या मुलाचा जयघोष केला जाईल तेंव्हा तेंव्हा तुझ्या नावाचा प्रथम उल्लेख केला जाईल".*

 आणि तेंव्हा पासून  

*जय भवानी..! जय शिवाजी(शिवराय)..!*

हे घोषवाक्य तयार झाले.


         छत्रपती *शिवरायांना* कोणत्याही प्रकारच्या काल्पनिक देवीने नव्हे तर *आई भवानी पाटील  यांनी व सांबरी गावच्या ग्रामस्थांनी तलवार बाजी व व युद्ध कला शिकवली होती.*


ब्रिटनची राजधानी लंडन च्या संग्रहालयात जी हिरे जडित मुठ असलेली ३५ किलो वजनाची *भवानी तलवार* आहे ती *शिवरायांनी* इ.स.१६४८ दरम्यान कोकणातील सरक्षदार सावंत यांच्या शस्त्रास्त्र लिलावात सुमारे ३५० होन एवढी रक्कम देऊन विकत घेतली होती.अशी नोंद राजेंच्या लेखापाल विभागात आहे. म्हणून *छत्रपती शिवरायांना* कोणत्या तरी *काल्पनिक देवी* ने ही तलवार दिली होती असा चूकीचा प्रचार अजिबात चुकून सुध्दा करु नये.आणि जर देवींनी तलवार दिलीच असती तर महाराजाना एवढे कष्ट यातना सहन करण्याची गरजच पडली असती एकाच *जादूने* सगळे कोमात नाहीतर स्वर्गात पाठवले असते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 बिना सोंडेचा गणपती पाहीलाय? 

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. आदि विनायक असे या मंदिराचे नाव आहे गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती संबोधले जाते.

|| गणपती बाप्पा मोरया || 🚩

 *एक किलो लोणी...*


एक *शेतकरी* आपल्या गावामधून शहराच्या बाजारात *लोणी* विकण्यासाठी जायचा. 

एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले.दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला.शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर *एक किलो लोणी* देऊ लागला.

दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता.काही दिवस असेच चालू राहिले.

एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले,तर ते *९०० ग्रॅमच भरले*.दुकानदाराला खूप राग आला.पैसे एक किलोचे घेतो. आणि लोणी ९०० ग्रॅमच देतो,हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही.

शेतकरी *फसवणूक* करत आहे, असा विचार त्याच्या मनात आला...

दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले.आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला.तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला ,तू मला धोका देत आहेस.

शेतकरी म्हणाला, *अहो भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही,तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो*.'

शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली.

*कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता.*

त्याच्या लक्षात आले की,

*आपण जसे कर्म करतो, तसेच फळ आपल्याला मिळते.*


या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की, *आपण चुकीचे काम केल्यास, आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.*

कारण शेवटी *जैसी करनी,वैसी भरनी*.

मी जगाला देईन,तसे जग मला देईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.

*सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते,त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही*

तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे ,तोपर्यंत छान जगा.

कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा...

*भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी 'पैसा' खाता येत नाही आणि 'पैसा' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त "अन्न" खाता येत नाही*

*म्हणजेच जीवनात 'पैशाला' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.*

पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा,आयुष्यभर *प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं* हीच  श्रीमंती आहे.

अत्तर सुगंधी व्हायला, फ़ुले सुगंधी असावी लागतात.


*नाती सुंदर व्हायला ,माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात.*


            🙏🏻🌹 🌹🙏🏻

Tuesday, 10 August 2021

 

 इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं: 

  "तडफड" म्हणजे नेमके काय  असतं" ?


सासु शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला. म्हणाली...

"घे अनुभव".


😜😜😝😂😂

 [10/08, 19:33] Baby: मुलांनी चिखलात का खेळायचे?


शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख.


 ज्यांनी ही डिझाईन केली त्यांना मानसशास्त्र, मज्जामानसशास्त्र आणि शरीरशास्त्र या तिघांची उत्तम जाण असणारा आहे कारण लहान मुलांनी चिखलामध्ये मातीमध्ये भरपूर आणि सातत्याने खेळणे अत्यंत आवश्यक आहे. 


मुलं चिखलात लोळली की आई ओरडते, बाबा मारतात.. "ए घाणेरड्या" नावाने संबोधले जाते. यातून *माती घाण असते असा चुकीचा विचार या बालवयात बिंबवला जातो आणि मग पुढे मुलं चिखलात पाय ठेवण्याची हिंमतच ठेवत नाही.*


याचा दुष्परिणाम असा होतो की *मुलांची रोग प्रतिकारक्षमता विकसित होत नाही.* ज्या मुलामुलींना चिखलात खेळण्याचे, मातीत उड्या मारण्याचे स्वातंत्र्य असते त्यांची रोगप्रतिकार क्षमता म्हणजेच इंम्युन सिस्टिम चांगली बनते.


आजकालची मुलं साधं शंभर किलोमीटर वर गाव बदलले की सर्दी होते, पाणी ची चव बदलली की पोट दुखते कारण *शरीरामध्ये कुठलेही बॅक्टेरिया आले की त्याला फाईट करण्याची पेशी या तयार झालेल्या नसतात.* या पेशी तेव्हा तयार होतात जेव्हा मुलं निसर्गतः सर्व गोष्टीला एक्सप्लोर करत असतात. *म्हणून मुलांना माती, चिखलात, पावसात खेळू दिले पाहिजे.*


आजकालच्या प्रतिष्ठित आयांना सांगावेसे वाटते की *मुलांच्या आयुष्यात बॅक्टेरिया (जिवाणू) चे स्वागत करा.* तुम्हाला टीव्ही मधली जाहिरात सांगते की मुलांच्या एका हातावर लाखो जीवाणू असतात ते घालवण्यासाठी आमचा साबण वापरा.. *"राजू तुम्हारा साबून स्लो है क्या?"*, सांगून कंपनीवाले करोडो रुपये कमावतात. आपण साधा विचार करत नाही की, आपल्या लहानपणी किंवा आपल्या आजोबांकडे असले साबण नव्हते. तरी ते कधीही आजारी पडले नाही.. आपल्यापेक्षा जास्त रोग प्रतिकार क्षमता त्यांची होती. *कारण त्यांच्या डोक्यात असले जाहिरातीची खुळ (सजेशन) नव्हते आणि ते निसर्गात वाढत होते.*


मुलांना मातीत खेळल्याने मेंदूच्या पेशींची वाढ अधिक उत्तम होते. पहिल्या आठ वर्षाच्या आत बाल मेंदूची जडणघडण सर्वात अधिक होत असते. 80% मेंदू या वयात घडत असतो. *जितक्या मेंदूच्या पेशींना चेतना मिळेल तेवढे सिन्याप्स निर्मिती होत असते. जितकी सिन्याप्स निर्मिती होईल तेवढा मेंदू अधिक शक्तिशाली व बुद्धिमान बनतो. सिन्याप्स निर्मिती तेव्हा जास्त होते जेव्हा मुल मनसोक्तपणे, तणावरहित आणि पाचही ज्ञानेंद्रियांना सोबत खेळेल. चिखलात खेळतांना पाचही ज्ञानेंद्रियांचा विकास होतो.* चिखलामध्ये मूलं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांची संवेदन क्षमता अधिक विकसित होते.


सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा पाया हा लहानपणी मनसोक्त हुंदडण्या मध्ये असतो आणि या हुंदडण्या मध्ये महत्त्वाची एक्टिविटी म्हणजे चिखलात उड्या मारणे, पाणी उडवणे, लोळणे,खेळणे असते. 

*मुलं नखशिकांत चिखलात माखलेल्या असताना जेव्हा हातामध्ये मातीचा गोळा घेतात आणि वरती आकाशाकडे पाहत ढगांच्या आकाराचे मातीचे गोळे बनवतात तेव्हा या क्रियेमुळे मुलांची क्रिएटिव्हिटी अधिक विकसित होते.*


सर्वात महत्त्वाचे मूल जेव्हा चिखलात उड्या मारतात तेव्हा त्यांच्या मनात कळत-नकळत साचलेला ताण निघून जातो.. मुलं अधिक रिलॅक्स होतात.. हे करू नको, ते करू नको.. घाणीत जाऊ नको.. चिखल घाण आहे.. *या सर्व वाक्यांचे कुंपण तोडून ते अधिक मुक्त होतात. ते अधिक आनंदी व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करतात.*


अतिचंचल मुलांसाठी चिखलात खेळणे तर गरजेचेच असते.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलं जेव्हा चिखलात खेळतात तेव्हा ते आपल्या *मातीशी कनेक्ट होतात.* मातीचा स्पर्श काय असतो तो त्यांना समजतो. चप्पल बूट न घालता खुल्या पायांनी जेव्हा ते एक तास चिखलात राहतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने या मातीशी या पृथ्वीशी संपर्कात येतात. त्यामुळे मुलांना अधून-मधून शूज न घालता मातीमध्ये जाऊद्या. 


मी हे सर्व सांगतोय हे शास्त्र जागतिक स्तरावर मान्य केलेले असून कितीतरी हेल्थ ऑर्गनायझेशन *"मड थेरपी"* नावाखाली या सर्व ॲक्टीव्हीटी आयोजित करत असतात.


म्हणून आपल्या मुलांना या पावसाळी वातावरणात जवळपास कुठे शेत असेल, भाताची पेरणी चालू असेल असेल तिथे घेऊन जा. *मुलांना चिखलात खेळू द्या कारण आयुष्याच्या अखेरीस अभ्यास किती लक्षात राहिला हे आठवणार नाही तर आनंदाचे क्षण किती निर्माण झाले तेच लक्षात राहतील.*


*इस्पॅलियर स्कूल* मध्ये हे आनंदाचे क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी सातत्याने पावसाळ्यामध्ये "मड पार्टी" आयोजित केली जाते. विद्यार्थी त्यांच्या टीचर सोबत मनसोक्त चिखल खेळतात. कारण ही शाळा असा विचार करते की *विद्यार्थ्यांना खेळायला भरपूर टॉईजची आवश्यकता नाही.. आवश्यकता आहे ती थोड्या साहसी खेळाची..*



😜😜😝😂😂

 तांडा-वस्तीच्या विकासासाठी निधीची वाढीव तरतूद करणार

- इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबईदि. 10 : राज्यातील बंजारा समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध विकासयोजनांच्या तरतुदीत वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करून या समितीमध्ये बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

         मंत्रालयातील दालनात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना निधी वाटपाबाबत इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश राठोड, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्तायासह ओबीसी व्हिजे-एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानपप्रकाश राठोड, साधनाताई राठोड यासह या समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवतमाळ, नांदेड, जालना, परभणीबीडसोलापूर, औरंगाबादलातूरहिंगोलीवाशिम या दहा जिल्ह्यात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करून या समितीमध्ये बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात यावेत. जेणेकरून या समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. तांडा/वस्तींचा विकास करताना पाणी, रस्ते व समाज मंदिर या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मंत्री श्री. वडेट्टीवार

 बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात

पॅराग्लायडर्सबलून उडविण्यास प्रतिबंध

 

            मुंबईदि. 10 : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत  पॅराग्लायडर्सबलूनउंच जाणारे फटाके  तसेच लेसर प्रकाश (बीम) यांना प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर2021 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

          बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हे आदेश जारी केले आहेत. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईलअसेही आदेशात नमूद असून मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारीबृहन्मुंबईएस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

Featured post

Lakshvedhi