Saturday, 22 August 2026

महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार

 महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २२ : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

 

नागपूर केंद्राचे नुकतेच २६ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व मोठ्या केंद्रांमधून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टाटा स्ट्राइव्हच्या विविध विस्तार व भागीदार केंद्रांमधूनही ६ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे येथे वातानुकूलन क्षेत्रासाठी, तर पुणे आणि भिलवडी (सांगली) येथे ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष प्रशिक्षण सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय तळोजा आणि नागपूर येथे बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi