मनपातर्फे विशेष मोहीम
गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मनपातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जलपर्णीमुळे तलावाचा मोठा परिसर व्यापला गेला होता. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य बाधित होण्यासोबतच जलतरणपटू आणि नौकायनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी आणि वीड हार्वेस्टरचा वापर करण्यात आला. या मोहिमेमुळे तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली असून अंबाझरी तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि खुला झाला आहे. तलावाच्या संवर्धनासाठी मनपाने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment