रायगडच्या विकासकामांना गती देत नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा
– रोहयो मंत्री भरत गोगावले
§ विभागनिहाय आढावा बैठकीत विविध विकासकामे,
§ आरोग्य सुविधा व कामकाजाचा आढावा
मुंबई, दि. १०: रायगड जिल्ह्यातील सर्व विभागांनी सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकासकामे व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांना शासकीय योजनांचा व सुविधांचा वेळेत लाभ मिळेल, यासाठी विभागांनी समन्वयाने व गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील विभागनिहाय सद्य:स्थिती (२०२६-२७) बाबत आढावा बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा, प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.
No comments:
Post a Comment