देशातील खतांच्या आयातीबाबत , देशाला लागणाऱ्या युरियापैकी सुमारे २० टक्के, डीएपीपैकी ५० टक्के, तर एमओपी (पोटॅश) खताची १०० टक्के आयात करावी लागते. युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळीवर परिणाम होत असला तरी राज्यात सध्या खतांची कोणतीही कमतरता नसून केंद्र सरकारकडून मंजूर आवंटनानुसार पुरेसा पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात विलीनीकरण करण्यात आले असून, सन २०२६-२७ पासून 'महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान' राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment