रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीला व्यापक चालना
– कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २ : राज्यातील शेतकऱ्यांचे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला व्यापक चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आगामी काळात पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या सूचनेला उत्तर देताना त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती सभागृहात मांडली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील शेती व्यवस्था मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांवर अवलंबून आहे. मागील पाच वर्षांत राज्यात दरवर्षी सरासरी ६९ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला असून, त्यापैकी खरीप हंगामात सुमारे ४३ लाख मेट्रिक टन आणि रब्बी हंगामात २६ लाख मेट्रिक टन खतांचा वापर होतो. सन २०२५-२६ मध्ये राज्यात ७४.६५ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला असून, रासायनिक खतांचा वाढता वापर ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment