यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्य शासनाने शेतकरी हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे पीक, घरे आणि जनावरे वाहून गेल्यावर आपत्कालीन तातडीने मदत केली आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत ५६ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. सुरुवातीची ३६,५८५ कोटींची कर्जमुक्तीची तरतूद होती आता ती ४०,५८५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख पीककर्ज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना यांतून शेतकऱ्यांना हजारो कोटींची मदत देण्यात येत आहे महिला शेतकरी सन्मान, एआय धोरण, कृषी समृद्धी आणि पाणंद रस्ता या योजनेसारखे अनेक शेतकरी हिताचे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
0000
No comments:
Post a Comment