राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राजशिष्टाचार विभागाकडे थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) तसेच डायस्पोरा अफेअर्स अँड आउटरीच या नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून जगभरातील महाराष्ट्राच्या परिवाराशी दृढ, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक संबंध निर्माण करण्याचे काम सुरू असून जागतिक मराठी समाजाला राज्याच्या विकास प्रक्रियेत सक्रिय भागीदार म्हणून जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राची ताकद केवळ राज्याच्या भौगोलिक सीमांमध्ये नसून जगभर आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीमध्ये असल्याचे सांगून त्यांनी उद्योग, व्यापार, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, वित्त, संशोधन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठी बांधवांचे अभिनंदन केले. परदेशात राहूनही मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि परंपरा जतन करणाऱ्या महाराष्ट्र मंडळे व सामाजिक संस्थांच्या कार्याचेही राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment