Monday, 1 June 2026

एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम

 एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम नसून तो विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला प्रदेश नसून तो विविधांगी संस्कृतीनी सजलेला देश आहे असे त्यांनी सांगितले. गोवा महाराष्ट्राचा शेजारी आहे, आणि दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होते. मुंबईत कामानिमित्त आलेल्या सिक्कीमच्या लोकांनी आपली संस्था निर्माण करावी व परस्परांना सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.   

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'मारिया पिता शे' या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले. 

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi