महाराष्ट्रात आतापर्यंत इतिहास घडवला तो जिल्हा परिषदेच्या शाळांनी या शाळांमधून आजचे उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, कवी, लेखक, कृषी तज्ज्ञ, समाज सुधारक तयार झाले आहेत. विशेषतः मराठी माध्यमातून शिकूनही ते कुठेही गुणवत्तेत मागे पडलेले नाही. भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण आमच्या अनेक पिढ्यांनी अनुभवले आहे. अपार कष्ट, अवहेलना सहन करून अशा शाळांमधून शिक्षण घेत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. देशातील मोठमोठ्या संस्थांवरचे गुणवान जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच तयार झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या आणि विशेषतः जिल्हा परिषद शाळांच्या दारी नेण्याची हीच योग्य वेळ आहे.
No comments:
Post a Comment