नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग राज्यात अव्वल स्थानी आणू
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
लोकसहभागातून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा संकल्प माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांनी केला होता. हाच संकल्प राज्य शासन पुढे घेऊन जात आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विविध विकास कार्ये होत आहेत. राज्य शासन या सर्व विकास कार्याला भरघोस मदत करेल व येत्या काळात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला राज्यात अव्वल स्थान मिळवून देऊ, असा विश्वास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यकत केला.
No comments:
Post a Comment